गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी


नवी दिल्ली : येत्या गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांच्या सुविधा वाढवतानाच काही गाड्यांचे थांबेही वाढवावेत. जेणे करुन चाकरमान्यांना आपल्या गावी पोहोचणे सहज सुलभ होईल. गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या चालवतानाच रेल्वे सेवांमध्ये तातडीने आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.स्लीपर आणि जनरल डब्यांचे अतिरिक्त कोच वाढवा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. यावेळी गणेशोत्सवात विशेष गाड्या सोडतानाच अधिकच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत रेल्वे प्रशासनाला तात्काळ सुचना देत असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी संगितले.


गणेशोत्सवातील रेल्वेसेवेबाबत लक्ष वेधण्यासाठी बुधवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खा. नारायण राणे यांनी भेट घेत चर्चा केली आणि निवेदनही सादर केले. कोकणातील गणेश चतुर्थी उत्सव म्हणजे मोठा सण. महाराष्ट्राच्या विविध भागांमधून असणारे कोकणवासी या उत्सवात आपल्या गावच्या घरी परततात. यावेळी उपलब्ध असणारी सर्व वाहतुक अपुरी पडते. मुंबई आणि पुण्यात राहणारे भाविक, त्यांच्या कुटुंबियांसोबत हा उत्सव साजरा करण्यासाठी कोकणातील त्यांच्या घरी पोहोचतातच.



२७ ऑगस्ट २०२५ रोजी होत असलेल्या गणेश चतुर्थी उत्सवात कोकणात पोहोचण्यासाठी रेल्वे प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते, ज्यामुळे गर्दी वाढते आणि रेल्वे आरक्षण मिळवण्यात अडचणी येतात. भारतीय रेल्वेने ऐतिहासिकदृष्ट्या या उत्सवादरम्यान विशेष गाड्या चालवल्या आहेत. वाढती लोकसंख्या आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची वाढती लोकप्रियता यामुळे रेल्वे सेवांमध्ये आणखी सुधारणा करण्याची गरज वाढली आहे. गेल्यावर्षी गणेशोत्सवासाठी ३४२ विशेष गाड्यांसह मोठ्या संख्येने विशेष गाड्या चालवल्या आहेत. हे एक अतिशय स्वागतार्ह पाऊल होते आणि कोकणात प्रवास करणाऱ्यांना त्याचा खूप फायदा झाला. यावर्षी यापेक्षाही जास्त गाड्यांचे नियोजन व्हावे अशी मागणी खा. नारायण राणे यांनी केली आहे.



अनेक मुद्द्यांकडे निवेदनातून वेधले लक्ष


रेल्वे मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात खा. राणे यांनी अनेक मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. मुंबई आणि पुणेसारख्या प्रमुख शहरांना चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि कोकण रेल्वे मार्गावरील इतर महत्त्वाच्या स्थानकांशी जोडणाऱ्या विशेष रेल्वे सेवांची संख्या वाढवा. या विशेष गाड्यांची वेळेवर घोषणा आणि आरक्षण सुरू करण्याची खात्री करा, जेणेकरून प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे आधीच नियोजन करता येईल आणि शेवटच्या क्षणी होणारी गर्दी आणि गैरसोय टाळता येईल. प्रवाशांच्या गर्दीला सामावून घेण्यासाठी, विशेषतः स्लीपर आणि जनरल डब्यांमध्ये, जे प्रवासी लोक सर्वाधिक वापरतात, त्यांना सामावून घेण्यासाठी विद्यमान गाड्यांमध्ये अतिरिक्त कोच सुरू करण्याच्या तात्काळ सुचना द्या. कोकणातील विविध ठिकाणी जाण्यासाठी काही विशेष गाड्यांचे मार्ग थांबे वाढवा. पुरेशा आणि कार्यक्षम रेल्वे सेवा उपलब्ध करून दिल्यास प्रवासातील अडचणी कमी होतील आणि उत्सवाचा आनंदही वाढेल असे रेल्वेमंत्र्यांकडे त्यांनी भुमिका मांडली आहे. यावेळी सर्व सेवा सकारात्मक पुरविण्याचे अभिवचन रेल्वे मंत्र्यांनी दिले आहे.

Comments
Add Comment

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी