सीमा सुरक्षा दलात नोकरीची संधी


नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलात अर्थात बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये (BSF) कॉन्स्टेबल ट्रेड्समनच्या भरतीसाठी अधिसूचना जारी झाली आहे. या पदासाठी २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत bsf.gov.in वर ऑनलाईन अर्ज करता येईल. एकूण ३५८८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. रिक्त जागांमध्ये पुरुषांसाठी ३४०६ आणि महिलांसाठी १८२ जागा असतील. या भरतीसाठी अर्ज २६ जुलै २०२५ पासून ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याचे वृत्त आहे.


भरती स्वयंपाकी, पाणी वाहक, वेल्डर, सुतार, प्लंबर, रंगारी, इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर, मोची, शिंपी, धोबी, न्हावी, सफाई कामगार या कामांसाठी होणार आहे. किमान दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. तांत्रिक रिक्त जागांसाठी आयटीआय केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असेल. तसेच ट्रेड चाचणी उत्तीर्ण होण्याचे बंधन असेल.


सीमा सुरक्षा दलातील रिक्त जागांसाठी १८ ते २५ या वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतील. नियमानुसार अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची सूट देण्यात येईल. पात्र उमेदवारांची निवड शारीरिक कार्यक्षमता चाचणी, शारीरिक मानक चाचणी, कागदपत्र पडताळणी, व्यापार चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल. सीमा सुरक्षा दलात क्रीडा प्रकारात कॉन्स्टेबल भरतीसाठी २० ऑगस्टपर्यंत आणि ग्रुप सी हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर, रेडिओ मेकॅनिकसाठी ३० जुलै २०२५ पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येईल.


Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान