सीमा सुरक्षा दलात नोकरीची संधी


नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलात अर्थात बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये (BSF) कॉन्स्टेबल ट्रेड्समनच्या भरतीसाठी अधिसूचना जारी झाली आहे. या पदासाठी २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत bsf.gov.in वर ऑनलाईन अर्ज करता येईल. एकूण ३५८८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. रिक्त जागांमध्ये पुरुषांसाठी ३४०६ आणि महिलांसाठी १८२ जागा असतील. या भरतीसाठी अर्ज २६ जुलै २०२५ पासून ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याचे वृत्त आहे.


भरती स्वयंपाकी, पाणी वाहक, वेल्डर, सुतार, प्लंबर, रंगारी, इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर, मोची, शिंपी, धोबी, न्हावी, सफाई कामगार या कामांसाठी होणार आहे. किमान दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. तांत्रिक रिक्त जागांसाठी आयटीआय केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असेल. तसेच ट्रेड चाचणी उत्तीर्ण होण्याचे बंधन असेल.


सीमा सुरक्षा दलातील रिक्त जागांसाठी १८ ते २५ या वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतील. नियमानुसार अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची सूट देण्यात येईल. पात्र उमेदवारांची निवड शारीरिक कार्यक्षमता चाचणी, शारीरिक मानक चाचणी, कागदपत्र पडताळणी, व्यापार चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल. सीमा सुरक्षा दलात क्रीडा प्रकारात कॉन्स्टेबल भरतीसाठी २० ऑगस्टपर्यंत आणि ग्रुप सी हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर, रेडिओ मेकॅनिकसाठी ३० जुलै २०२५ पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येईल.


Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर