सीमा सुरक्षा दलात नोकरीची संधी


नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलात अर्थात बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये (BSF) कॉन्स्टेबल ट्रेड्समनच्या भरतीसाठी अधिसूचना जारी झाली आहे. या पदासाठी २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत bsf.gov.in वर ऑनलाईन अर्ज करता येईल. एकूण ३५८८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. रिक्त जागांमध्ये पुरुषांसाठी ३४०६ आणि महिलांसाठी १८२ जागा असतील. या भरतीसाठी अर्ज २६ जुलै २०२५ पासून ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याचे वृत्त आहे.


भरती स्वयंपाकी, पाणी वाहक, वेल्डर, सुतार, प्लंबर, रंगारी, इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर, मोची, शिंपी, धोबी, न्हावी, सफाई कामगार या कामांसाठी होणार आहे. किमान दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. तांत्रिक रिक्त जागांसाठी आयटीआय केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असेल. तसेच ट्रेड चाचणी उत्तीर्ण होण्याचे बंधन असेल.


सीमा सुरक्षा दलातील रिक्त जागांसाठी १८ ते २५ या वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतील. नियमानुसार अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची सूट देण्यात येईल. पात्र उमेदवारांची निवड शारीरिक कार्यक्षमता चाचणी, शारीरिक मानक चाचणी, कागदपत्र पडताळणी, व्यापार चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल. सीमा सुरक्षा दलात क्रीडा प्रकारात कॉन्स्टेबल भरतीसाठी २० ऑगस्टपर्यंत आणि ग्रुप सी हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर, रेडिओ मेकॅनिकसाठी ३० जुलै २०२५ पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येईल.


Comments
Add Comment

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे

पीएनजी असलेल्या भागात एलपीजी पुरवठा होणार बंद

नवी दिल्ली : देशातील ऊर्जा साखळीत मोठी सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले

आकाशवाणीवरुन २६ मार्चपासून "वंदे मातरम्" राष्ट्रीय गीताची पूर्ण आवृत्तीचे प्रसारण

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर आकाशवाणी केंद्रांच्या सकाळच्या प्रसारणाची सुरुवात वैशिष्ट्यपूर्ण 'सिग्नेचर