सीमा सुरक्षा दलात नोकरीची संधी


नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलात अर्थात बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये (BSF) कॉन्स्टेबल ट्रेड्समनच्या भरतीसाठी अधिसूचना जारी झाली आहे. या पदासाठी २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत bsf.gov.in वर ऑनलाईन अर्ज करता येईल. एकूण ३५८८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. रिक्त जागांमध्ये पुरुषांसाठी ३४०६ आणि महिलांसाठी १८२ जागा असतील. या भरतीसाठी अर्ज २६ जुलै २०२५ पासून ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याचे वृत्त आहे.


भरती स्वयंपाकी, पाणी वाहक, वेल्डर, सुतार, प्लंबर, रंगारी, इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर, मोची, शिंपी, धोबी, न्हावी, सफाई कामगार या कामांसाठी होणार आहे. किमान दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. तांत्रिक रिक्त जागांसाठी आयटीआय केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असेल. तसेच ट्रेड चाचणी उत्तीर्ण होण्याचे बंधन असेल.


सीमा सुरक्षा दलातील रिक्त जागांसाठी १८ ते २५ या वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतील. नियमानुसार अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची सूट देण्यात येईल. पात्र उमेदवारांची निवड शारीरिक कार्यक्षमता चाचणी, शारीरिक मानक चाचणी, कागदपत्र पडताळणी, व्यापार चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल. सीमा सुरक्षा दलात क्रीडा प्रकारात कॉन्स्टेबल भरतीसाठी २० ऑगस्टपर्यंत आणि ग्रुप सी हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटर, रेडिओ मेकॅनिकसाठी ३० जुलै २०२५ पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येईल.


Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव