IND vs ENG : पहिल्या दिवसाचा खेळ संपला, भारताच्या ४ बाद २६४ धावा

मँचेस्टर : भारत वि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीचा पहिला दिवस संमिश्र राहिला. पहिल्या दिवशी भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना दिवसअखेर ४ बाद २६४ धावा केल्या आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत शार्दूल ठाकूर आणि रवींद्र जडेजा दोघेही १९ धावांवर खेळत आहेत.


या सामन्यात इंग्लडने ट़ॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. बेन स्टोक्सने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिल्या दिवशीला भारताला झटका बसला तो ऋषभ पंतच्या रूपात. ऋषभ पंतला या सामन्यात दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले.


पाच सामन्यांच्या मालिकेत भारत १-२ अशा पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिकेत टिकून राहायचे असेल तर भारताला हा सामना काही करून जिंकावाच लागेल.



राहुलची चमकदार कामगिरी


मँचेस्टरच्या ऐतिहासिक ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटीदरम्यान केएल राहुलने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. राहुलने इंग्लंडच्या धरतीवर आपल्या १००० कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. ही खास कामगिरी करणारा तो भारताचा पाचवा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी ही कामगिरी केवळ सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावस्कर आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजांनी केली आहे.
Comments
Add Comment

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.