मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग, अनेक ठिकाणी पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत

मुंबई: महाराष्ट्रात सध्या मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला असून अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. हवामान विभागाने राज्यातील विविध भागांसाठी पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


मुंबई उपनगरात रात्रीपासून संततधार सुरु असून कांदिवली, बोरिवली, अंधेरी, गोरेगावसारख्या भागांत अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. आकाशात काळे ढग दाटून आले असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


विदर्भात ढगफुटीसदृश पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांत अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील लघु पाटबंधारे प्रकल्प भरून ओसंडून वाहत आहे. यामुळे भिंतीला भगदाड पडल्याने प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.


रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि घाटमाथ्याच्या परिसरातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्रकिनारी उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.समुद्रात ३.५ ते ४.३ मीटर उंच लाटा येण्याचा अंदाज वर्तवल्याने होड्या-बोटी समुद्रात न नेण्याचे व सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


हिंगोली जिल्ह्यातील सरस्वती नदीला मोठा पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. बीड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र जालना जिल्ह्यातील वडीगोद्री परिसरात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, तत्काळ पंचनाम्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.


चंद्रपूर, माजलगाव आणि इतर भागांतील पाऊस शेतकऱ्यांसाठी आश्वासक ठरत असला तरी, काही जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे नुकसानाची नोंद झाली आहे. लोणार परिसरात नदी-नाल्यांना पूर आला असून वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Comments
Add Comment

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक