मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग, अनेक ठिकाणी पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत

मुंबई: महाराष्ट्रात सध्या मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला असून अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. हवामान विभागाने राज्यातील विविध भागांसाठी पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


मुंबई उपनगरात रात्रीपासून संततधार सुरु असून कांदिवली, बोरिवली, अंधेरी, गोरेगावसारख्या भागांत अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. आकाशात काळे ढग दाटून आले असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


विदर्भात ढगफुटीसदृश पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांत अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील लघु पाटबंधारे प्रकल्प भरून ओसंडून वाहत आहे. यामुळे भिंतीला भगदाड पडल्याने प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.


रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि घाटमाथ्याच्या परिसरातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्रकिनारी उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.समुद्रात ३.५ ते ४.३ मीटर उंच लाटा येण्याचा अंदाज वर्तवल्याने होड्या-बोटी समुद्रात न नेण्याचे व सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


हिंगोली जिल्ह्यातील सरस्वती नदीला मोठा पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. बीड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र जालना जिल्ह्यातील वडीगोद्री परिसरात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, तत्काळ पंचनाम्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.


चंद्रपूर, माजलगाव आणि इतर भागांतील पाऊस शेतकऱ्यांसाठी आश्वासक ठरत असला तरी, काही जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे नुकसानाची नोंद झाली आहे. लोणार परिसरात नदी-नाल्यांना पूर आला असून वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे