Dombivali Fire : डोंबिवलीत अग्नितांडव! एमआयडीसीतील दोन कंपन्यांना भीषण आग

डोंबिवली : डोंबिवलीमधील एमआयडीसी (MIDC) परिसरात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एरोसेल आणि विश्वनाथ गारमेंट या २ कंपन्यांना भीषण आग लागली असून आगीच्या प्रचंड ज्वाळा आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहे. MIDC परिसरात ही आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.




एरोसेल आणि विश्वनाथ गारमेंट कंपनीला आग


मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी फेज वन परिसरात असलेल्या विश्वनाथ गारमेंट कंपनीला दुपारी अचानक आग लागली. त्यानंतर ती आग एरोसेल कंपनीपर्यंत पोहोचली. या आगीची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि बदलापूर येथील अग्निशमन दलाच्या ३ ते ४ गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. विश्वनाथ गारमेंट कंपनी ही कापडावर प्रक्रिया करणारी कंपनी आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.



आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू


या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस यंत्रणाही तातडीने घटनास्थळी पोहोचली आहे. पोलिसांनी परिसरातील गर्दी हटवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली. आग लागलेल्या कंपनीत काही कर्मचारी अडकल्याची प्राथमिक माहिती असून, त्यांचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ही आग नेमकी कशी लागली आणि आग लागण्याचं कारण काय, याबाबतचा तपास सध्या सुरू आहे. या आगीमुळे मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सध्या आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन