संसदेत गोंधळ, जनतेच्या पैशांचा अपव्यय

संसदेत गोंधळ, कोट्यवधींचा चुराडा


नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू झालंय. मात्र पहिल्याच दिवशी विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज पूर्णपणे ठप्प झालं. प्रत्येक मिनिटाला सुमारे अडीच लाख रुपये खर्च होणाऱ्या या संसदेच्या २१ दिवसांच्या अधिवेशनासाठी तब्बल १८९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. हा पैसा जनतेच्या करातून येतो आणि गोंधळामुळे तो वाया जातोय? यावर सरकारसह विरोधक गंभीर नाहीत का, जनतेच्या पैशांचा कशासाठी चुराडा केला जातोय.

?si=29b8FYf-Ju5U6IHJ

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासातच लोकसभेचं कामकाज स्थगित करावं लागलं. दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर २ वाजेपर्यंत संसदेचं कामकाज पुढे ढकलण्यात आलं. विरोधकांनी बिहारमधील निवडणूक आयोग प्रक्रिया आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली. सरकारनं सर्व विषयांवर चर्चेसाठी तयारी दाखवली, मात्र विरोधकांनी गोंधळ घातलाच. संसदेचा प्रत्येक मिनिटाचा खर्च हा जनतेच्या खिशातून जातो. जर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एखाद्या विषयावर योग्य चर्चा केली तरच हा पैसा देशाच्या विकासासाठी खर्च होईल. मात्र गोंधळामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय होतोय. हा गोंधळ नवीन नाही. मागील काही वर्षांत पेगासस प्रकरण, राफेल करार, हिंडनबर्ग अहवाल यांसारख्या मुद्द्यांवर विरोधकांनी संसदेचं कामकाज ठप्प केलंय.



२०२३च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हिंडनबर्ग अहवालावरून आणि बीबीसीच्या प्रचारात्मक माहिती पटावरूनही गोंधळ घातला. त्यामुळे संसदेचा वेळ आणि जनतेचा बराच पैसा वाया गेला. संसदेचा प्रतिमिनिट खर्च अडीच लाख रुपये आहे. यंदा २१ दिवसांत १२६ तास म्हणजेच ७५६० मिनिटांच्या कामकाजाचे नियोजन आहे. या हिशोबाने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा खर्च १८९ कोटींच्या घरात जातो. यात खासदारांच्या प्रतिदिन भत्त्याच्या अडीच हजार रुपयांसह इतर अनेक खर्चांचा समावेश आहे.
Comments
Add Comment

भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली : देशभरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत राज्य आणि केंद्र सरकारे प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात

अयोध्येत राम मंदिराचे काम पूर्णत्वास! मुख्य मंदिरासह सहा उपमंदिरांचेही काम पूर्ण

अयोध्या : शतकानुशतके चाललेल्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रभू श्रीरामांच्या भक्तांसाठी सर्वात मोठी आनंदवार्ता आली

स्वदेशी बनावटीचे सर्वेक्षण जहाज ‘इक्षक’ ६ नोव्हेंबरला नौदलात होणार सामील

नवी दिल्ली : स्वदेशी बनावटीचे सर्वेक्षण जहाज 'इक्षक' ६ नोव्हेंबर रोजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी

मराठा-कुणबी आरक्षण जीआरवर तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : मराठा-कुणबी आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या जीआरवर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

Election Commission : वादग्रस्त 'एसआयआर' मोहीम आता 'या' १२ राज्यांत!

बिहारमधील टीकेनंतरही केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; १२ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांत एसआयआरचा दुसरा

विमानतळावरचे महागडे पदार्थ खरेदी करायचे नसतील तर ट्राय करा ही आयडिया

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल वन (T1) कडे जात असताना एका प्रवासी महिलेनं महागडे पदार्थ खरेदी करण्याआधी