संसदेत गोंधळ, जनतेच्या पैशांचा अपव्यय

संसदेत गोंधळ, कोट्यवधींचा चुराडा


नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू झालंय. मात्र पहिल्याच दिवशी विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज पूर्णपणे ठप्प झालं. प्रत्येक मिनिटाला सुमारे अडीच लाख रुपये खर्च होणाऱ्या या संसदेच्या २१ दिवसांच्या अधिवेशनासाठी तब्बल १८९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. हा पैसा जनतेच्या करातून येतो आणि गोंधळामुळे तो वाया जातोय? यावर सरकारसह विरोधक गंभीर नाहीत का, जनतेच्या पैशांचा कशासाठी चुराडा केला जातोय.

?si=29b8FYf-Ju5U6IHJ

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासातच लोकसभेचं कामकाज स्थगित करावं लागलं. दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर २ वाजेपर्यंत संसदेचं कामकाज पुढे ढकलण्यात आलं. विरोधकांनी बिहारमधील निवडणूक आयोग प्रक्रिया आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली. सरकारनं सर्व विषयांवर चर्चेसाठी तयारी दाखवली, मात्र विरोधकांनी गोंधळ घातलाच. संसदेचा प्रत्येक मिनिटाचा खर्च हा जनतेच्या खिशातून जातो. जर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एखाद्या विषयावर योग्य चर्चा केली तरच हा पैसा देशाच्या विकासासाठी खर्च होईल. मात्र गोंधळामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय होतोय. हा गोंधळ नवीन नाही. मागील काही वर्षांत पेगासस प्रकरण, राफेल करार, हिंडनबर्ग अहवाल यांसारख्या मुद्द्यांवर विरोधकांनी संसदेचं कामकाज ठप्प केलंय.



२०२३च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हिंडनबर्ग अहवालावरून आणि बीबीसीच्या प्रचारात्मक माहिती पटावरूनही गोंधळ घातला. त्यामुळे संसदेचा वेळ आणि जनतेचा बराच पैसा वाया गेला. संसदेचा प्रतिमिनिट खर्च अडीच लाख रुपये आहे. यंदा २१ दिवसांत १२६ तास म्हणजेच ७५६० मिनिटांच्या कामकाजाचे नियोजन आहे. या हिशोबाने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा खर्च १८९ कोटींच्या घरात जातो. यात खासदारांच्या प्रतिदिन भत्त्याच्या अडीच हजार रुपयांसह इतर अनेक खर्चांचा समावेश आहे.
Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे