श्रावण महिन्यात मांसाहार का टाळावा ?

मुंबई : श्रावण महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची पूजा, व्रत आणि उपवास केले जातात. त्याचप्रमाणे केस न कापणे , मांसाहार टाळणे अशा अनेक प्रथा या महिन्यात पाळल्या जातात . या परंपरेमागे काही धार्मिक, आयुर्वेदिक कारणे आहेत.


भगवान शंकराची उपासना करण्यासाठी श्रावण महिना संपूर्णपणे भगवान शंकराला समर्पित मानला जातो. यावेळी अनेक भक्त सोमवारचं व्रत करतात आणि शिवलिंगावर जलाभिषेक करतात. अध्यात्मिक साधनेत अडथळा ठरू नये म्हणून मांसाहार या काळात वर्ज्य केला जातो. या महिन्यात शुद्ध आणि सात्त्विक आहारावर भर दिला जातो.


या काळात मांसाहार टाळणे ही एक जुनी परंपरा आहे, जी धर्म, आरोग्य यावर आधारित आहे. शरीर शुद्ध, मन शांत आणि आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी या काळात शाकाहारी, सात्त्विक आहार घेणं हेच योग्य ठरतं. म्हणूनच अनेक लोक या काळात मांसाहार सोडून सात्विक आहार घेतात .


श्रावण महिन्यात मांसाहार टाळण्यामागे धार्मिक कारणांबरोबरच वैज्ञानिक कारणेदेखील तितकीच महत्त्वाची आहेत. पावसाळ्यात वातावरणात ओलावा आणि तापमानातील चढ-उतारामुळे शरीराची पचनशक्ती कमी होते. अशा परिस्थितीत मांसाहारासारखा जड आहार घेतल्यास अपचन, गॅस, पित्त, अन्नविषबाधा यासारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. याच काळात रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी झालेली असते, त्यामुळे सर्दी, ताप, त्वचारोग यांचा धोका वाढतो. पावसात मांस, मासे आणि अंडी लवकर खराब होतात व त्यातून अपायकारक बॅक्टेरिया तयार होतात. यातून संसर्गजन्य रोगांचा धोका अधिक वाढतो. शिवाय, मांसाहार हा तामसिक आहार मानला जातो, जो मानसिक स्थैर्यावर परिणाम करतो – चिडचिड, आळस, आणि मानसिक अस्वस्थता निर्माण करतो. त्यामुळे श्रावण महिन्यात मांसाहार टाळणे आरोग्यदृष्ट्याही फायदेशीर ठरते.

Comments
Add Comment

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सारथीने सुरू करावेत : विखे पाटील

मुंबई : उद्योजकांच्या संघटनांशी संपर्क ठेवून औद्योगिक व सेवा क्षेत्रात मागणी असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाचे

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी