Monsoon Update: मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट! येत्या २४ तासांत 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

पुणे: गेल्या दोन दिवसापासून मुंबई सह अनेक ठिकाणी  मुसळधार सरी बरसत आहे. पुढील २४ तासांत काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पालघर वगळता संपूर्ण कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला असून, संपूर्ण किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.


पावसाची तीव्रता लक्षात घेता मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जोरदार वाऱ्यांसह समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असून, किनारपट्टी भागातील नागरिकांनीही सतर्क राहावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मध्यम ते जोरदार सरी पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी विजांचाही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडणे आज टाळा.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद