Monsoon Update: मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट! येत्या २४ तासांत 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

पुणे: गेल्या दोन दिवसापासून मुंबई सह अनेक ठिकाणी  मुसळधार सरी बरसत आहे. पुढील २४ तासांत काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पालघर वगळता संपूर्ण कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला असून, संपूर्ण किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.


पावसाची तीव्रता लक्षात घेता मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जोरदार वाऱ्यांसह समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असून, किनारपट्टी भागातील नागरिकांनीही सतर्क राहावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मध्यम ते जोरदार सरी पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी विजांचाही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडणे आज टाळा.

Comments
Add Comment

पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पुणे :  पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील

'नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं हवी'

नाशिक : नाशिक जिल्ह्यात २०२७ मध्ये होणार असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं हवी. कुंभमेळ्याला

शालेय पोषण आहार पुरवणाऱ्या संस्था येत्या ३० एप्रिलपर्यंत गॅस सिलिंडरचा पुरवठा

मुंबई: प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिजविलेला आहार पुरवठा करणा-या महिला

Missing Link' Project: मुंबई-पुण्यातील अंतर कमी होणार, 'मिसिंग लिंक'चं काम पूर्ण; लवकरच प्रवाशांसाठी खुला

मुंबई: बहुप्रतीक्षित मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे. या प्रोजेक्टशी संबंधित असलेल्या एक

कागलमध्ये ३५७.९९ कोटींचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान व केंद्रीय मंत्री गडकरींचे आभार व्यक्त

कोल्हापूर: कोल्हापूरच्या कागल येथे राष्ट्रीय महामार्ग-48 वर 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळाली आहे.३५७.९९

PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर' योजनेत महाराष्ट्राची बाजी

- उत्तर प्रदेश, गुजरातला टाकले मागे; चार महिन्यांत १ लाख ८ हजार घरांवर सौर यंत्रणा मुंबई : स्वच्छ आणि शाश्वत