सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. राज्यामधील पहिला अत्याधुनिक काचेचा पूल (Skywalk) वैभववाडी तालुक्यातील निसर्गरम्य नापणे धबधब्यावर उभारण्यात आला आहे. आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या भव्य पुलाचे दिमाखदार लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे कोकणच्या पर्यटन नकाशावर एक नवा अध्याय सुरू झाला आहे.





'सिंधूरत्न' योजनेअंतर्गत साकारण्यात आलेला हा काचेचा पूल, पर्यटकांना नापणे धबधब्याचे विहंगम आणि थरारक दृश्य अनुभवण्याची एक अविस्मरणीय संधी देणार आहे. काचेच्या पारदर्शक पुलावरून खाली कोसळणारा धबधबा पाहणे हा अनुभव पर्यटकांसाठी निश्चितच रोमांचक असणार आहे.


या प्रकल्पामुळे कोकणामध्ये केवळ एक नवे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळच निर्माण झाले नाही, तर स्थानिक पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. या पुलामुळे नापणे धबधबा परिसरातील पर्यटन वाढेल, ज्यामुळे स्थानिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. हा काचेचा पूल कोकणच्या नैसर्गिक सौंदर्यात आधुनिकतेचा स्पर्श देत, पर्यटकांना एक अनोखा आणि अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी सज्ज झाला आहे.

Comments
Add Comment

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

रत्नागिरीत युनिट टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेतील कमी गुणांमुळे भविष्याच्या चिंतेतून आईने हटकले