किल्ले रायगडावरून परतलेल्या पर्यटकांच्या बसला अपघात

दहा जण किरकोळ जखमी


माणगाव : पावसाळी पर्यटनासाठी किल्ले रायगड आणि पुनाडेवाडी घरोशी वाडी येथील मनमोहक दृश्य आणि कोकणातील पावसाळी बहुविध निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मुंबई, पुणे शहर तसेच राज्यातून विविध पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. माणगाव किल्ले रायगड मार्गावर माणगाव घरोशी गावाच्या हद्दीत एका खासगी बसला झालेल्या अपघातात दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले.


शनिवार, रविवार या दोन दिवशी रायगडावर पावसाळी पर्यटनासाठी गर्दी होत आहे. रविवारी पुणे येथून खासगी बसने टाटा कंपनीचे कर्मचारी गडावर आले होते. परतीच्या प्रवासात हा अपघात झाला. खासगी बस घरोशी गावाच्या हद्दीत पलटी झाली. यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. या प्रवाशांना पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा अपघात रस्त्यावर तीव्र उतार असल्याने गाडी घसरल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग