किल्ले रायगडावरून परतलेल्या पर्यटकांच्या बसला अपघात

दहा जण किरकोळ जखमी


माणगाव : पावसाळी पर्यटनासाठी किल्ले रायगड आणि पुनाडेवाडी घरोशी वाडी येथील मनमोहक दृश्य आणि कोकणातील पावसाळी बहुविध निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मुंबई, पुणे शहर तसेच राज्यातून विविध पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. माणगाव किल्ले रायगड मार्गावर माणगाव घरोशी गावाच्या हद्दीत एका खासगी बसला झालेल्या अपघातात दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले.


शनिवार, रविवार या दोन दिवशी रायगडावर पावसाळी पर्यटनासाठी गर्दी होत आहे. रविवारी पुणे येथून खासगी बसने टाटा कंपनीचे कर्मचारी गडावर आले होते. परतीच्या प्रवासात हा अपघात झाला. खासगी बस घरोशी गावाच्या हद्दीत पलटी झाली. यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. या प्रवाशांना पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा अपघात रस्त्यावर तीव्र उतार असल्याने गाडी घसरल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

Comments
Add Comment

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वाहतूक सुरू, पहिल्या विमानाचं जोरदार स्वागत

पनवेल : रायगड जिल्ह्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून (गुरुवार २५ डिसेंबर २०२५)

सिडको-नैना क्षेत्रातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन

पनवेल तालुक्यातील ४६ गावांचा प्रश्न मार्गी लागणार पनवेल : पनवेल तालुक्यामधील सिडको व नैना अधिसूचित क्षेत्रातील

कर्जतमध्ये सुधाकर घारे यांचे जोरदार कमबॅक

नितीन सावंतांना सोबत घेऊन थोरवे आणि लाड यांना धक्का कर्जत : येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत परिवर्तन विकास

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित

विकासकामांना ग्रामस्थांनी निवडले रुपेंद्र मळेकर रोहा : रोहा नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या चुरशीच्या झालेल्या

उबाठाशी युती राष्ट्रवादीच्या फळाला आली

मुरुडकरांनी जुन्यांना नाकारले तरुणांकडे धुरा! उदय खोत नांदगाव मुरुड : मुरुड नगरपरिषदेची निवडणूक

आपली पोरं सांभाळू शकले नाहीत, ते मुंबई काय सांभाळणार?

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली