AC लोकल ट्रेनला गळती; जास्त पैसे देऊन देखील प्रवाशांना मनस्ताप!

मुंबई : सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह अनेक भागात मुसळधार पावसामुळे पाणी भरले आहे. अशातच आज सकाळी , मुंबईच्या AC लोकल ट्रेनमधील एसी व्हेंटमधून पावसाचे पाणी गळत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मुंबईत जोरदार पावसामुळे एसी लोकलमध्ये पाणी शिरले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना या समस्येचा सामना करावा लागला .


प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाने AC लोकल सेवा सुरु केली . सामान्य लोकलपेक्षा AC लोकलचे तिकीट दर जास्त असतात . परिणामी जास्त पैसे देऊन देखील प्रवाशांना अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे .


सकाळ सकाळी नोकरदारवर्ग घाईघाईत आपआपल्या कामावर जाण्याच्या घाईत असतो . पावसामुळे लोकल ट्रेन च्या वेळापत्रकात देखील बदल होत असतो त्यातच एसी लोकल ट्रेनमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला आहे . काही प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया वर शेअर करत रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे .


प्रवाशांच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनाने या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे . मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे . या घटनेमुळे मुंबईच्या रेल्वे व्यवस्थेच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपुर्वी दिवा येथे लोकलमधून पडून काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने मुंबईच्या सर्व लोकल एसी करण्याचा प्रस्ताव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला होता. जेणेकरुन लोकलच्या दारावर कोणालाही लोंबकळता येणार नाही. परंतु लोकलची दार बंद केल्यानंतरही जर प्रवाशांची गैरसोय होणार असेल तर प्रवाशांनी काय करावं? असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे.

Comments
Add Comment

मुंबईच्या विकासाकडे नाही तर दिवा,घड्याळ, साडी, फणी, वेणीकडे लक्ष; महापौरांनी शेलक्या शब्दांत घेतला विरोधी पक्षनेत्यांचा समाचार

मुंबई: महापौरांच्या गाडीवर बसवण्यात आलेल्या लुकलुकणाऱ्या दिव्यांच्या मुद्यावर विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या

शिवछत्रपतींविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचे निलंबन करा; मंत्री नितेश राणे विधानसभेत कडाडले

मुंबई: अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विधानसभेत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आमदार

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूल एप्रिलपर्यंत होणार वाहतूकीसाठी खुला

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड पर्यंत

जलजीवनच्या कामांसाठी ३१ हजार कोटींच्या निधीची गरज

मंत्री गुलाबराव पाटील यांची विधानसभेत माहिती; रखडलेल्या कामांवरून लोकप्रतिनिधींनाही सुनावले मुंबई : "वर्षाला

मुंबई महापालिकेच्या विधी समिती अध्यक्षपदी दीक्षा कारकर तर बाजार,उद्यान समिती अध्यक्षपदी मीनल तुर्डे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदी मीनल तुर्डे, उपाध्यक्षपदी रिटा

बायपास शस्त्रक्रीयेसाठी एक रुपयाही खर्च येत नाही!

आरोग्य मंत्र्यांची विधानसभेत माहिती; रुग्णालयांनी पैसे मागितल्यास त्वरित कारवाई करणार मुंबई : राज्यातील गरजू