AC लोकल ट्रेनला गळती; जास्त पैसे देऊन देखील प्रवाशांना मनस्ताप!

मुंबई : सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह अनेक भागात मुसळधार पावसामुळे पाणी भरले आहे. अशातच आज सकाळी , मुंबईच्या AC लोकल ट्रेनमधील एसी व्हेंटमधून पावसाचे पाणी गळत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मुंबईत जोरदार पावसामुळे एसी लोकलमध्ये पाणी शिरले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना या समस्येचा सामना करावा लागला .


प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाने AC लोकल सेवा सुरु केली . सामान्य लोकलपेक्षा AC लोकलचे तिकीट दर जास्त असतात . परिणामी जास्त पैसे देऊन देखील प्रवाशांना अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे .


सकाळ सकाळी नोकरदारवर्ग घाईघाईत आपआपल्या कामावर जाण्याच्या घाईत असतो . पावसामुळे लोकल ट्रेन च्या वेळापत्रकात देखील बदल होत असतो त्यातच एसी लोकल ट्रेनमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला आहे . काही प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया वर शेअर करत रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे .


प्रवाशांच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनाने या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे . मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे . या घटनेमुळे मुंबईच्या रेल्वे व्यवस्थेच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपुर्वी दिवा येथे लोकलमधून पडून काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने मुंबईच्या सर्व लोकल एसी करण्याचा प्रस्ताव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला होता. जेणेकरुन लोकलच्या दारावर कोणालाही लोंबकळता येणार नाही. परंतु लोकलची दार बंद केल्यानंतरही जर प्रवाशांची गैरसोय होणार असेल तर प्रवाशांनी काय करावं? असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे.

Comments
Add Comment

महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक विभाग, पर्यटन विभागाची स्थापना

महायुतीने दिला मुंबईतील मतदारांना शब्द मुंबई : मुंबईची संस्कृती, कला व वारसा जतन व प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई

मंत्री नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर

जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा ‘कोर्टा’च्या कचाट्यात

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे लक्ष मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या

'मुंबईला जागतिक दर्जाचे शहर करणार'

मुंबई : विकास हाच आमचा केंद्रबिंदू असून मुंबईचा रखडलेला विकास पुन्हा वेगाने सुरू करण्यात आला. घरकुल योजना,

वर्षभरात मुंबई ‘बांगलादेशीमुक्त’ करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : 'मुंबईत अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या सर्व बांगलादेशी नागरिकांना शोधून काढून येत्या येत्या वर्षभरात

मी परकी नाही, उत्तर भारतीय मराठीच आहे’; मैथिली ठाकूरची मुंबईत प्रचारात एन्ट्री, मराठी गीताने वेधलं लक्ष

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. प्रचाराला १०० तासांपेक्षा कमी कालावधी