AC लोकल ट्रेनला गळती; जास्त पैसे देऊन देखील प्रवाशांना मनस्ताप!

मुंबई : सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह अनेक भागात मुसळधार पावसामुळे पाणी भरले आहे. अशातच आज सकाळी , मुंबईच्या AC लोकल ट्रेनमधील एसी व्हेंटमधून पावसाचे पाणी गळत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मुंबईत जोरदार पावसामुळे एसी लोकलमध्ये पाणी शिरले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना या समस्येचा सामना करावा लागला .


प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाने AC लोकल सेवा सुरु केली . सामान्य लोकलपेक्षा AC लोकलचे तिकीट दर जास्त असतात . परिणामी जास्त पैसे देऊन देखील प्रवाशांना अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे .


सकाळ सकाळी नोकरदारवर्ग घाईघाईत आपआपल्या कामावर जाण्याच्या घाईत असतो . पावसामुळे लोकल ट्रेन च्या वेळापत्रकात देखील बदल होत असतो त्यातच एसी लोकल ट्रेनमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला आहे . काही प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया वर शेअर करत रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे .


प्रवाशांच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनाने या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे . मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे . या घटनेमुळे मुंबईच्या रेल्वे व्यवस्थेच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपुर्वी दिवा येथे लोकलमधून पडून काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने मुंबईच्या सर्व लोकल एसी करण्याचा प्रस्ताव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला होता. जेणेकरुन लोकलच्या दारावर कोणालाही लोंबकळता येणार नाही. परंतु लोकलची दार बंद केल्यानंतरही जर प्रवाशांची गैरसोय होणार असेल तर प्रवाशांनी काय करावं? असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे.

Comments
Add Comment

जनगणना २०२७: मुंबईत पूर्व चाचणी चेंबूर एम पश्चिम विभागात

मुंबई (खास प्रतिनिधी) : जनगणना - २०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या

महाराष्ट्रातील ७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले असून, सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद? जाणून घ्या...

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास आधीच सावधान राहा, कारण नोव्हेंबरमध्ये

कबुतर खान्यांसाठी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, केली ही मागणी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी