AC लोकल ट्रेनला गळती; जास्त पैसे देऊन देखील प्रवाशांना मनस्ताप!

मुंबई : सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह अनेक भागात मुसळधार पावसामुळे पाणी भरले आहे. अशातच आज सकाळी , मुंबईच्या AC लोकल ट्रेनमधील एसी व्हेंटमधून पावसाचे पाणी गळत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मुंबईत जोरदार पावसामुळे एसी लोकलमध्ये पाणी शिरले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना या समस्येचा सामना करावा लागला .


प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाने AC लोकल सेवा सुरु केली . सामान्य लोकलपेक्षा AC लोकलचे तिकीट दर जास्त असतात . परिणामी जास्त पैसे देऊन देखील प्रवाशांना अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे .


सकाळ सकाळी नोकरदारवर्ग घाईघाईत आपआपल्या कामावर जाण्याच्या घाईत असतो . पावसामुळे लोकल ट्रेन च्या वेळापत्रकात देखील बदल होत असतो त्यातच एसी लोकल ट्रेनमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला आहे . काही प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया वर शेअर करत रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे .


प्रवाशांच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनाने या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे . मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे . या घटनेमुळे मुंबईच्या रेल्वे व्यवस्थेच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपुर्वी दिवा येथे लोकलमधून पडून काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने मुंबईच्या सर्व लोकल एसी करण्याचा प्रस्ताव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला होता. जेणेकरुन लोकलच्या दारावर कोणालाही लोंबकळता येणार नाही. परंतु लोकलची दार बंद केल्यानंतरही जर प्रवाशांची गैरसोय होणार असेल तर प्रवाशांनी काय करावं? असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.