८ वर्षांनंतरही 'दयाबेन'ची प्रतीक्षा कायम; असित मोदी म्हणतात, "दिशा वकानीला परत आणणं सोपं नाही..."

मुंबई: छोट्या पडद्यावर गेल्या १७ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' सध्या पुन्हा एकदा टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी पोहोचली आहे. भूताच्या ट्रॅकमुळे प्रेक्षकांची पसंती मिळवत या मालिकेने इतर अनेक मालिकांना मागे टाकले आहे. सध्या मालिकेत जेठालाल गडा या पात्रावर लक्ष केंद्रित केले जात असले तरी, प्रेक्षकांना अजूनही दयाबेन या पात्राची आणि ती साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी हिची आठवण येत आहे. चाहते सातत्याने निर्मात्यांना दिशाच्या पुनरागमनाबद्दल विचारणा करत आहेत.


निर्माते असित मोदी काय म्हणाले?


'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी दयाबेनच्या पुनरागमनावर आणि मालिकेच्या यशाबाबत बोलताना सांगितले की, "प्रेक्षक दयाबेन मालिकेत कधी परतणार याबद्दल सतत विचारत असतात. दिशाजींनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर खोल छाप सोडली आहे. त्यांनी मालिका सोडून आठ वर्षे झाली आहेत, तरीही लोक त्यांना आठवतात. त्यांनी साकारलेले पात्र अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहे, इतक्या उत्तम पद्धतीने त्यांनी ती भूमिका साकारली होती."


दिशा वकानीला मालिकेत परत आणण्याबद्दल बोलताना असित मोदींनी स्पष्ट केले की, "दिशाजींना परत आणणं सोपं नाही, त्यासाठी योग्य वेळ आणि योग्य परिस्थितीची आवश्यकता आहे." सध्या ते मालिकेच्या कथाकथनावर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी सांगितले. "जेव्हा कथा मजबूत असते, तेव्हा लोक आपोआप कथानकाशी जोडले जातात. एखाद्या पात्राची अनुपस्थिती फारशी जाणवत नाही. हा शो नेहमीच त्याच्या कथेमुळे टिकून राहिला आहे. जोपर्यंत आम्ही मनोरंजक कंटेंट देत आहोत, तोपर्यंत काही पात्रे मालिकेत असोत किंवा नसोत, लोक जोडलेले राहतात," असेही मोदींनी नमूद केले.


यावरून तरी, नजीकच्या भविष्यात दिशा वकानी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत परतण्याची शक्यता कमीच असल्याचे दिसते. मात्र, दयाबेनच्या पात्राची क्रेझ आजही कायम असल्याचे निर्मात्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते.

Comments
Add Comment

मृणाल ठाकूरने ‘वध 2’चे केले कौतुक; नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक

मुंबई : अभिनेत्री मृणाल ठाकूरने नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित

Sakhe G Sajani : 'सखे गं साजणी'तून उलगडणार तीन मित्रांची रंजक गोष्ट; ही' तगडी स्टारकास्ट झळकणार मुख्य भूमिकेत

मुंबई : खऱ्या मित्रांसोबत केलेला प्रवास हा केवळ ठिकाणं बदलण्यासाठी नसतो, तर तो स्वतःला शोधण्यासाठी आणि नाती अधिक

‘Vadh 2’ movie review : 'वध २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार नीना गुप्ता-संजय मिश्रांची जादू!

मुंबई : चित्रपटसृष्टीत नेहमीच बंदिवास आणि सामाजिक नियंत्रणाच्या कथा प्रभावीपणे मांडल्या गेल्या आहेत. याच

मृणाल ठाकूरचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल; चाहते आश्चर्यचकित

Mrunal Thakur : दक्षिण चित्रपटसृष्टी गाजवलेली आणि तितकीच मराठमोळ्या चित्रपटांहून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी

अवघ्या २ आठवड्यात मोडले सर्व मोठे रेकॉर्ड; जगभरात होते 'या' सिरीजची चर्चा..

Netflix Series : बॉलीवूड अभिनेता इमरान हाशमी याच्या वेबसिरीजने सध्या सोशल मीडिया वर धुमाकूळ घातला आहे. २०२६ ची सुरूवात

kajol : मी मारण्यापूर्वी..., अभिनेत्री काजोलच खळबळजनक वक्तव्य

kajol : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही प्रेक्षकांच्या मनावर आजही तेवढंच राज्य करते जेवढं ती आधी करत होती.