बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आरोपींचा जामीन फेटाळला



मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अखिलेंद्र प्रताप सिंग आणि आकाशदीप सिंग या दोन आरोपींचा जामीन अर्ज विशेष मोक्का न्यायालयाने फेटाळला. बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी हत्या झाली होती. त्यांच्यावर तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या प्रकरणात कॉल डेटा रेकॉर्डच्या मदतीने पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले होते.

आरोपींविरोधात सध्या न्यायालयीन कारवाई सुरू आहे. ही कारवाई सुरू असतानाच अखिलेंद्र प्रताप सिंग आणि आकाशदीप सिंग या दोन आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. जामीन मागताना, अखिलेंद्रने मकोका लावण्याच्या पोलिसांच्या निर्णयालाच आव्हान दिले. तर आकाशदीपने त्याला आरोपी करण्यासाठी पोलिसांकडे ठोस पुरावेच नसल्याचा दावा केला.

आरोपींच्या जामिनावर सुनावणी झाली त्यावेळी विशेष सरकारी वकील महेश मुळे आणि सिद्दीकीचे वकील प्रदीप घरत आणि त्रिवनकुमार कर्णानी यांनी आक्षेप घेतला. आरोपपत्रात असे काही आहे जे प्रथमदर्शनी आरोप सिद्ध करते. यामुळे जामीन देऊ नये अशी भूमिका विशेष सरकारी वकील महेश मुळे यांनी घेतली. सरकारी पक्ष आणि पीडित कुटुंबाच्या वकिलांनी केलेल्या आक्षेपांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले.

Comments
Add Comment

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

तुम्हाला माहित आहे का डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे ?

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतं. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी महायुती सरकारकडून विशेष खबरदारी

महिलांसाठीच्या ‘वन स्टॉप सेंटर्स’साठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करणार मुंबई : महिलांवरील हिंसाचार,