बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आरोपींचा जामीन फेटाळला



मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अखिलेंद्र प्रताप सिंग आणि आकाशदीप सिंग या दोन आरोपींचा जामीन अर्ज विशेष मोक्का न्यायालयाने फेटाळला. बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी हत्या झाली होती. त्यांच्यावर तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या प्रकरणात कॉल डेटा रेकॉर्डच्या मदतीने पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले होते.

आरोपींविरोधात सध्या न्यायालयीन कारवाई सुरू आहे. ही कारवाई सुरू असतानाच अखिलेंद्र प्रताप सिंग आणि आकाशदीप सिंग या दोन आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. जामीन मागताना, अखिलेंद्रने मकोका लावण्याच्या पोलिसांच्या निर्णयालाच आव्हान दिले. तर आकाशदीपने त्याला आरोपी करण्यासाठी पोलिसांकडे ठोस पुरावेच नसल्याचा दावा केला.

आरोपींच्या जामिनावर सुनावणी झाली त्यावेळी विशेष सरकारी वकील महेश मुळे आणि सिद्दीकीचे वकील प्रदीप घरत आणि त्रिवनकुमार कर्णानी यांनी आक्षेप घेतला. आरोपपत्रात असे काही आहे जे प्रथमदर्शनी आरोप सिद्ध करते. यामुळे जामीन देऊ नये अशी भूमिका विशेष सरकारी वकील महेश मुळे यांनी घेतली. सरकारी पक्ष आणि पीडित कुटुंबाच्या वकिलांनी केलेल्या आक्षेपांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा, राज्यात कुठे होणार युती आणि कुठे मैत्रीपूर्ण लढती ?

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या

भाजपचा शरद पवार गटाला मोठा धक्का

धुळे : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही