मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक उड्डाण पूल अद्यापही अपूर्णच

टोलवसुलीसाठी सुकेळी खिंडीत जोरात तयारी सुरू


अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक उड्डाण पूल अपूर्णावस्थेत असतानाही मुंबई-गोवा महामार्गाच्या सर्वात विवादित कासू ते इंदापूर या ४२.३ किलोमीटर अंतराच्या टोलवसुलीसाठी सुकेळी खिंडीत गाठण्याची तयारी सध्या जोरात सुरू झाली आहे. खिंडीच्या पायथ्याशी भव्य टोलप्लाझा उभारला जात असून, या टोलप्लाझाचे काम अंतिम टप्प्यात आहे.


टोल वसुलीसाठी आता केवळ अधिसूचना निघणे बाकी असून, जानेवारी महिन्यापासून या टप्प्यातील टोल वसुली करण्यास सुरुवात करावी लागेल, असे म्हणणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे आहे. महामार्गाच्या या पहिल्या टप्प्यातील नागोठणे, कोलाड नाका येथील प्रमुख उड्डाण पुलांची कामे अद्याप ४० टक्के देखील पूर्ण झालेली नाहीत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी अपूर्ण कामांमुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. सध्या पडणाऱ्या पावसामुळे झालेल्या चिखलातून वाहने चालवावी लागत आहेत, अशाच कंबरतोड प्रवासानंतरही कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना टोल भरावा लागणार आहे. न्यायालयाच्या आदेशाने या टप्प्याचे काम या वर्षीच्या डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे; परंतु सध्या सुरू असलेल्या कामाचा वेग पहाता, ही डेडलाईन पुन्हा हुकणार असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत अनेक डेडलाईन हुकलेल्या या महामार्गाच्या टोलवसुलीची डेडलाईन चुकणार नाही, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महामार्गाच्या कामापेक्षा या टोलप्लाझाच्या उभारणीचे काम अतिवेगात केवळ दोन महिन्यांत पूर्ण करण्यात आले. यावरून टोलवसुलीसाठी किती घाई चालली आहे, हे दिसून येत आहे. याला जिल्ह्यातील राजकीय लोकांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे.


टोल वसुलीतून टोल नाक्यापासून १५ किलोमीटरच्या परिसरातील वाहन चालकांना सूट दिली जाणार आहे. यासाठी या वाहन चालकांना टोलनाक्यावर आपल्या वाहनांची नोंद करावी लागणार आहे. त्यानुसारच नाक्यावरुन त्या वाहनाला जाण्यास परवानगी दिली जाईल.


त्यापेक्षा जास्त अंतरातील नागरिकांना टोल भरणे सक्तीचे असेल. यात अधिक पारदर्शकता यावी यासाठी जीपीएस प्रणालीचा वापर केला जाणार आहे. टोलवसुलीतील काही बारकाव्यांचा अभ्यास सध्या केला जात आहे. टोल वसुली झटपट व्हावी यासाठी फास्टटॅगचा वापर केला जाणार आहे. यासाठी तीन लेन तयार केल्या जात असून, रोखीने टोल भरणाऱ्यांसाठी एक लेन शिल्लक ठेवण्यात आली आहे. या लेनमधून जाणाऱ्या वाहनांना जर २० रुपये टोल फास्टटॅगने भरावा लागणार होता त्यासाठी साधारण ४० रुपये टोल रोखीने भरावा लागणार आहे. ही आकारणी फास्टटॅगपेक्षा दुप्पट आहे. यातून दुचाकी वाहनांना सूट असणार आहे.



अधिसूचना येण्याची प्रतीक्षा


महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत संपविण्याचे आदेश आहेत. हे काम कल्याण रोडव्हेज या कंत्राटदाराकडून वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. एकाच वेळी अनेक ठिकाणी कामे सुरू असून सध्याच्या पावसामुळे त्यात थोडा व्यत्यय आला. हे काम संपल्यानंतर लगेचच टोल वसुली करावी लागेल. टोलवसुली सुरू करण्यासाठी अधिसूचना येणे बाकी आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक (तांत्रिक व प्रकल्प संचालक) यशवंत घोटकर यांनी दिली.

Comments
Add Comment

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य

REIL: रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेडची भारतातील एआय इकोसिस्टिम उभारण्यासाठी मोठी घोषणा

मोहित सोमण: रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेडने आज मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची संपूर्ण उपकंपनी

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून रशियन तेल आयात कपातीविषयक मोठे स्पष्टीकरण अद्याप सस्पेन्स कायम !

मोहित सोमण:रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांच्या रशियन कच्च्या तेलाच्या आयातीत कपात करण्याचे ठरवले अशी माहिती

Eknath Shinde in Delhi : मोठी ब्रेकिंग! मध्यरात्री उपमुख्यमंत्री शिंदेंची अचानक 'दिल्लीवारी'; महायुतीत नेमकी कोणती नवी 'राजकीय घडामोड'? कारण आलं समोर...

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री तातडीने दिल्ली गाठल्यामुळे (Delhi Visit) राजकीय वर्तुळात

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या

Maharashtra Rain Updates : पावसाचा जोर कायम! आज कुठे-कुठे कोसळणार वादळी पाऊस? २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान हवामान खात्याचा मोठा इशारा

मुंबई : सध्या दिवसभर जाणवणाऱ्या 'ऑक्टोबर हीट' (October Heat) मुळे नागरिक हैराण झाले असून, राज्यात उकाडा चांगलाच वाढला आहे.