इको-सेन्सिटीव्ह झोन रद्द करण्यासाठी आग्रही

शेकाप नेते जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलनाचा इशारा


अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांत इको सेन्सिटीव्ह झोन टाकण्यात आल्याचा मसुदा तहसील कार्यालयाकडून जारी करण्यात आला असून, रायगड जिल्ह्यातील तब्बल ४३७ गावे ही इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये येत असल्याचे केंद्र सरकारच्या मसुद्यामध्ये आहेत. त्यात रोहा तालुक्यातील ११९ गावे वन व पर्यावरण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. यावर हरकती घेत इको सेन्सिटीव्ह झोन रद्द करण्यात यावा, अशी मागणी शेकापने केली आहे. शेकापच्या वतीने रोहा तहसीलदार किशोर देशमुख, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, रोहा तालुका वन उपविभागीय अधिकारी डॉ. शैलेंद्रकुमार जाधव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात वेळ पडल्यास शेतकऱ्यांसाठी शेकापने पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.


रोहा तालुका हा औद्योगिक एमआयडीसी असलेला तालुका आहे, तसेच मुंबई व नवी मुंबई, पनवेल महापालिकेच्या जवळ असलेला तालुका आहे. रोहा तालुक्यालगतचे अलिबाग, पेण तालुके एमएमआरडी क्षेत्रात आहेत. रोहा तालुक्यामध्ये नागोठणे परिसरात रिलायन्स इंडस्ट्रीज, महाराष्ट्र सिमलेस, महालक्ष्मी सिमलेस, सुप्रिल पेट्रोकेमिकल, जिंदाल ड्रिलिंग, विभोर स्टील हे कारखाने आहेत, तर धाटाव एमआयडीसी क्षेत्रामध्ये ५० रासायनिक कारखाने आहेत. तसेच रोहा तालुका हा भात उत्पादक शेतकऱ्यांचा तालुका आहे. रोह्याचा पोहा हा देशभरामध्ये जातो, तसेच शेतीपुरक व्यवसाय म्हणून वीटभट्टी, कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, भाजीपाला शेतीचे व्यवसाय केले जातात.


पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित केल्यास शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीमध्ये कोणतेही पूरक व्यवसाय व कुटीर उद्योग करता येणार नाहीत. स्वतःची मालकीची जमीन असूनदेखील कुक्कुटपालन, वीट व्यवसाय, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, मत्स्यशेती व्यवसायदेखील शेतकऱ्यांना करता येणार नाहीत व जमिनी विकसित करता येणार नाहीत, तसेच शेतघरे, गुरांचे मोठे, स्वयंरोजगाराचे लघु व कुटिर उद्योग करता येणार नाहीत. त्यामुळे रोहे तालुक्यातील ११९ गावांतील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याच प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Health Department : आरोग्य विभागाच्या बदलीत राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील मनुष्यबळ व्यवस्थापनात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने

Nashik : मोठी बातमी ! डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळल्याने महिला कर्मचारी गंभीर जखमी

नाशिक : नाशिकमध्ये पुन्हा एकदा गंभीर लिफ़्ट दुर्घटना समोर आली आहे. नाशिकच्या आडगाव परिसरातील डॉ. वसंतराव पवार

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ₹१५०० येणार की ₹३००० येणार? अपडेट काय ?

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनेक गरजू

XChat : लाँच झाले एक्सचे एक्सचॅट ॲप

टेक्सास : एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने मेसेजिंग ॲप एक्सचॅट लॉन्च केले आहे. सध्या हे ॲप फक्त आयओएस

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादचा विजयी चौकार, गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप

जयपूर : इशान मलिंगाच्या नेतृत्वाखालील भेदक गोलंदाजी आणि अभिषेक शर्मा व इशान किशन यांच्यातील शतकी भागीदारीच्या