गिरगाव चौपाटीवर आता मासेमारीला मज्जाव, नाखवा संघाची सरकारकडे धाव

बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश


मुंबई : गिरगाव चौपाटीवरील बंदर बंद करण्यात आले आहे. मच्छीमारांसह अन्य बोटींच्या मालकांनीही आपल्या बोटी या चौपाटीवरून हटवाव्यात, असे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्तांनी दिले आहेत. मुळात गिरगाव चौपाटी व्यावसायिक बंदर नसले तरी, गेली अनेक वर्षांपासून या भागात वास्तव्य करणारे कोळी बांधव येथे मासेमारी करत होते. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर संक्रांत येण्याची दाट शक्यता आहे.

दक्षिण मुंबईत अरबी समुद्र किनाऱ्यालगत गिरगाव चौपाटी आहे. जी मुंबईतील सुप्रसिद्ध चौपाटींपैकी एक आहे. मुंबईसाठी आणि मुंबईत पूर्वापार काळापासून वास्तव्य करणाऱ्या समस्त कोळी लोकांसाठी ही चौपाटी सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. पूर्वी या चौपाटीवर दोन कोळीवाडे होते. त्यापैकी एका कोळीवाड्यातील रहिवाशांनी लोकमान्य टिळक यांच्या स्मारकासाठी जागा दिली. या मच्छीमारांना मासेमारीची जाळी आणि इतर साधने ठेवण्यासाठी १९३९ ते १९६८ या कालावधीत या चौपाटीवरील जागा ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली होती.

मात्र आता गिरगाव चौपाटीवर मासेमारी करण्यास बंदी घातल्यामुळे, मासेमारी करायची तरी कुठे असा प्रश्न स्थानिक मच्छिमारांना पडला आहे. यांबद्दल नाखवा संघाचे सरचिटणीस हिरालाल वाडकर यांनी सांगितले कि, "आतापर्यंत ही जागा नाखवा संघाच्या नावावर आहे. या जागेचा संपूर्ण भरणा आम्ही केला आहे. गिरगाव चौपाटीच्या सुशोभीकरणासाठी १९९६ मध्ये इथले बांधकाम पाडण्यात आले. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी बिर्ला क्रीडा केंद्राच्या मागील बाजूस मच्छीमारांसाठी जागा दिली. तेव्हापासून या ठिकाणी मासेमारीचा व्यवसाय सुरू आहे. आता तीही जागा तोडण्यात आली, अशी कैफियत नाखवा यांनी मांडली. चौपाटीवरील बोटी हटवण्यात याव्यात, असे मत्स्य आयुक्तालयाकडून आम्हाला सांगण्यात आले आहे."

‘न्यायालयाचे आदेश डावलून कारवाई’


मच्छीमारांना १५ दिवस आधी नोटीस देऊन मगच त्यांचे पुनर्वसन करावे, असे आदेश २००१ मध्ये उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, हे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने पाळलेले नाहीत. महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम १९८१ अंतर्गत जिल्हा सल्लागार समितीने २०११ मध्ये तयार केलेल्या इतिवृत्तात गिरगाव चौपाटी बंदर रद्द झालेले नाही, असे म्हटले आहे. तसा पुरावा आमच्याकडे आहे. अटींची पूर्तता केल्याशिवाय मच्छीमारांच्या घरांवर कोणतीही कारवाई करू नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश असतानाही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने या कारवाईत हस्तक्षेप करावा, अशी मागणी संघाने केली आहे.

आमच्याकडे पालिकेची झोपडे पावती


२०१८ मध्ये तत्कालीन मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मच्छीमारांच्या प्रश्नाबाबत विचारणा केली असता, मच्छीमारांनी चार जागा सुचवाव्यात, असे सांगितले होते. २००० मध्ये पालिकेने आम्हाला झोपडे पावती दिल्याकडे संघाने लक्ष वेधले.

 
Comments
Add Comment

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांनी सहकुटुंब ओढला श्रीजगन्नाथांचा रथ

मुंबई : भगवान श्रीजगन्नाथांच्या पवित्र रथयात्रेचे औचित्य साधून इस्कॉन, जुहू येथे आयोजित करण्यात आलेल्या ४५ व्या

BMC News : रुग्ण बनून सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष पोहोचले रात्री १२ वाजता केईएम रुग्णालयात

रुग्णालयातील परिस्थिती पाहून झाले हैराण अधिष्ठाता यांना दिले उच्च स्तरीय चौकशीचे आदेश मुंबई : मुंबई

Mumbai Rain Update : IMDचा इशारा! मुंबईसह ११ जिल्ह्यांना पुढील ३ तासांसाठी यलो अलर्ट!

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) आज, १८ जुलै २०२६ रोजी सकाळी नाऊकास्ट (Nowcast) इशारा जारी केला आहे. पुढील ३

Devendra Fadnavis : देवा भाऊंच्या वाढदिवसानिमित लाडक्या बहिणींच्या आरोग्याची तपासणी

मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये स्तन कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन वैद्यकीय क्षेत्रातील २ हजारांहून अधिक

Mumbai Trees : मुंबईतील झाडांच्या आरोग्य अभ्यासासाठी कृती आराखडा

वृक्षतज्ज्ञ व अभ्यासक यांच्या समवेत प्रशासनाची सखोल चर्चा मुुंबई : मुंबईत विविध कारणांनी होणाऱ्या

Ritu Tawde : महापौरांकडून तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक

मुंबईत हॉटेल्स,डेरीसह इतर खानपान सेवांची भेसळीच्या अनुषंगाने होणार तपासणी मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त