Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या वाढदिवशी कुटुंबीय भावुक, आठवणीत वाढदिवस केला साजरा

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाला (Vaishnavi Hagawane Suicide Case) आता दोन महिने पूर्ण झाले आहेत. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. एका उच्चभ्रू आणि श्रीमंत घराण्यातील महिलांवर बंद दाराआड होत असलेल्या अमानुष छळाच्या या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही वादळ उमटलेले पाहायला मिळाले. तसेच या संदर्भात वैष्णवीचा नवरा, सासू, सासरा, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. वैष्णवी आत्महत्या प्रकरणात अनेक नवनवीन खुलासे देखील उघडकीस आले होते. अशा या वैष्णवीचा काल २३ वा वाढदिवस होता. ज्यामुळे तिच्या आठवणीला पुन्हा उजाळा मिळाला.



"माझ्या लेकीला मिसळ खूप आवडायची."


वैष्णवीच्या कुटुंबीयांना तिच्या वाढदिवशी तिच्या आठवणींनी डोळ्यांत अश्रू आले. माध्यमांशी बोलताना वैष्णवीचे वडील भावूक होऊन म्हणाले, “आज ती असती तर तिचा वाढदिवस साजरा झाला असता. ती वाढदिवसाला घरी यायची. माझ्या लेकीला मिसळ खूप आवडायची. आजही तिच्या आठवणी ताज्या आहेत.” हे सांगताना त्यांच्या भावना आवरल्या नाहीत. तिच्या निधनानंतरही कुटुंबीयांनी तिच्या आठवणीत वाढदिवस साजरा केला. वैष्णवीला आवडणारी मिसळ तिच्या फोटोसमोर ठेवत कुटुंबीयांनी अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार