काँग्रेस, राजद सरकारने नेहमीच बिहारला लुटले

  51

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप


पाटणा : २०१४ नंतर तुम्ही मला केंद्रात सेवा करण्याची संधी दिली, आम्ही बदला घेण्याचे हे राजकारण संपवले. दोन दशकांपूर्वी बिहारचा हक्काचा पैसा कसा लुटला गेला हे आजच्या पिढीने जाणून घेणे महत्त्वाचे आहे. काँग्रेस आणि राजद सरकारने नेहमीच बिहारला लुटले आहे, हे लोक बिहारचा बदला घेत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.


निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी मोतिहारी येथे जनतेला संबोधित करताना मोदींनी पाटण्याला पुण्यासारखे आणि गयाला गुरुग्रामसारखे बनवले जाईल, असेही सांगितले. बिहारची भूमी ही आंदोलनाची भूमी आहे. एनडीए सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.



गरिबांसाठी ७ लाख घरे


गरिबांसाठी ४ कोटींहून अधिक घरे बांधली गेली आहेत, त्यापैकी सुमारे ७ लाख घरे एकट्या बिहारमध्ये गरिबांसाठी बांधली गेली आहेत. जगातील काही देशांच्या लोकसंख्येइतकीच बिहारमधील गरिबांना आम्ही काँक्रीटची घरे दिली आहेत. एकट्या मोतिहारी जिल्ह्यात आम्ही सुमारे ३ लाख गरीब कुटुंबांना घरे दिली आहेत. ही संख्या सतत वाढत आहे.



पंतप्रधानांनी दाखवला अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा


पंतप्रधान मोदींनी पूर्व चंपारणसाठी ७०० कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यांनी देशासाठी ४ अमृत भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यापैकी एक गाडी मोतिहारी ते दिल्ली दरम्यान धावेल. पंतप्रधान मोदी यांनी समस्तीपूर-बछवाडा रेल्वे विभागावरील स्वयंचलित सिग्नलिंग सुविधा राष्ट्राला समर्पित केली. याशिवाय, दरभंगा-थलवाडा आणि समस्तीपूर-रामभद्रपूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, जे ५८० कोटी रुपयांच्या दरभंगा -समस्तीपूर दुहेरीकरण प्रकल्पाचा एक भाग आहे. यामुळे गाड्यांचा विलंब कमी होईल आणि वेग वाढेल.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे