काँग्रेस, राजद सरकारने नेहमीच बिहारला लुटले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप


पाटणा : २०१४ नंतर तुम्ही मला केंद्रात सेवा करण्याची संधी दिली, आम्ही बदला घेण्याचे हे राजकारण संपवले. दोन दशकांपूर्वी बिहारचा हक्काचा पैसा कसा लुटला गेला हे आजच्या पिढीने जाणून घेणे महत्त्वाचे आहे. काँग्रेस आणि राजद सरकारने नेहमीच बिहारला लुटले आहे, हे लोक बिहारचा बदला घेत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.


निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी मोतिहारी येथे जनतेला संबोधित करताना मोदींनी पाटण्याला पुण्यासारखे आणि गयाला गुरुग्रामसारखे बनवले जाईल, असेही सांगितले. बिहारची भूमी ही आंदोलनाची भूमी आहे. एनडीए सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.



गरिबांसाठी ७ लाख घरे


गरिबांसाठी ४ कोटींहून अधिक घरे बांधली गेली आहेत, त्यापैकी सुमारे ७ लाख घरे एकट्या बिहारमध्ये गरिबांसाठी बांधली गेली आहेत. जगातील काही देशांच्या लोकसंख्येइतकीच बिहारमधील गरिबांना आम्ही काँक्रीटची घरे दिली आहेत. एकट्या मोतिहारी जिल्ह्यात आम्ही सुमारे ३ लाख गरीब कुटुंबांना घरे दिली आहेत. ही संख्या सतत वाढत आहे.



पंतप्रधानांनी दाखवला अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा


पंतप्रधान मोदींनी पूर्व चंपारणसाठी ७०० कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यांनी देशासाठी ४ अमृत भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यापैकी एक गाडी मोतिहारी ते दिल्ली दरम्यान धावेल. पंतप्रधान मोदी यांनी समस्तीपूर-बछवाडा रेल्वे विभागावरील स्वयंचलित सिग्नलिंग सुविधा राष्ट्राला समर्पित केली. याशिवाय, दरभंगा-थलवाडा आणि समस्तीपूर-रामभद्रपूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, जे ५८० कोटी रुपयांच्या दरभंगा -समस्तीपूर दुहेरीकरण प्रकल्पाचा एक भाग आहे. यामुळे गाड्यांचा विलंब कमी होईल आणि वेग वाढेल.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला