काँग्रेस, राजद सरकारने नेहमीच बिहारला लुटले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप


पाटणा : २०१४ नंतर तुम्ही मला केंद्रात सेवा करण्याची संधी दिली, आम्ही बदला घेण्याचे हे राजकारण संपवले. दोन दशकांपूर्वी बिहारचा हक्काचा पैसा कसा लुटला गेला हे आजच्या पिढीने जाणून घेणे महत्त्वाचे आहे. काँग्रेस आणि राजद सरकारने नेहमीच बिहारला लुटले आहे, हे लोक बिहारचा बदला घेत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.


निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी मोतिहारी येथे जनतेला संबोधित करताना मोदींनी पाटण्याला पुण्यासारखे आणि गयाला गुरुग्रामसारखे बनवले जाईल, असेही सांगितले. बिहारची भूमी ही आंदोलनाची भूमी आहे. एनडीए सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.



गरिबांसाठी ७ लाख घरे


गरिबांसाठी ४ कोटींहून अधिक घरे बांधली गेली आहेत, त्यापैकी सुमारे ७ लाख घरे एकट्या बिहारमध्ये गरिबांसाठी बांधली गेली आहेत. जगातील काही देशांच्या लोकसंख्येइतकीच बिहारमधील गरिबांना आम्ही काँक्रीटची घरे दिली आहेत. एकट्या मोतिहारी जिल्ह्यात आम्ही सुमारे ३ लाख गरीब कुटुंबांना घरे दिली आहेत. ही संख्या सतत वाढत आहे.



पंतप्रधानांनी दाखवला अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा


पंतप्रधान मोदींनी पूर्व चंपारणसाठी ७०० कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यांनी देशासाठी ४ अमृत भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यापैकी एक गाडी मोतिहारी ते दिल्ली दरम्यान धावेल. पंतप्रधान मोदी यांनी समस्तीपूर-बछवाडा रेल्वे विभागावरील स्वयंचलित सिग्नलिंग सुविधा राष्ट्राला समर्पित केली. याशिवाय, दरभंगा-थलवाडा आणि समस्तीपूर-रामभद्रपूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, जे ५८० कोटी रुपयांच्या दरभंगा -समस्तीपूर दुहेरीकरण प्रकल्पाचा एक भाग आहे. यामुळे गाड्यांचा विलंब कमी होईल आणि वेग वाढेल.

Comments
Add Comment

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार

Sabarimala Temple Case : सबरीमला मंदिर प्रवेश प्रकरणात केंद्र सरकारने मांडली स्पष्ट भूमिका; म्हणाले...

केरळमधील सबरीमला मंदिराबाबत (Sabarimala Temple Case) केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडली. केंद्र

Lashkar-e-Taiba : श्रीनगर पोलिसांची मोठी कारवाई; पोलिसांकडून लष्कर-ए-तैयबा नेटवर्कचा भंडाफोड

- दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांसह पाच जणांना अटक श्रीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी