काँग्रेस, राजद सरकारने नेहमीच बिहारला लुटले

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप


पाटणा : २०१४ नंतर तुम्ही मला केंद्रात सेवा करण्याची संधी दिली, आम्ही बदला घेण्याचे हे राजकारण संपवले. दोन दशकांपूर्वी बिहारचा हक्काचा पैसा कसा लुटला गेला हे आजच्या पिढीने जाणून घेणे महत्त्वाचे आहे. काँग्रेस आणि राजद सरकारने नेहमीच बिहारला लुटले आहे, हे लोक बिहारचा बदला घेत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.


निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी मोतिहारी येथे जनतेला संबोधित करताना मोदींनी पाटण्याला पुण्यासारखे आणि गयाला गुरुग्रामसारखे बनवले जाईल, असेही सांगितले. बिहारची भूमी ही आंदोलनाची भूमी आहे. एनडीए सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.



गरिबांसाठी ७ लाख घरे


गरिबांसाठी ४ कोटींहून अधिक घरे बांधली गेली आहेत, त्यापैकी सुमारे ७ लाख घरे एकट्या बिहारमध्ये गरिबांसाठी बांधली गेली आहेत. जगातील काही देशांच्या लोकसंख्येइतकीच बिहारमधील गरिबांना आम्ही काँक्रीटची घरे दिली आहेत. एकट्या मोतिहारी जिल्ह्यात आम्ही सुमारे ३ लाख गरीब कुटुंबांना घरे दिली आहेत. ही संख्या सतत वाढत आहे.



पंतप्रधानांनी दाखवला अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा


पंतप्रधान मोदींनी पूर्व चंपारणसाठी ७०० कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यांनी देशासाठी ४ अमृत भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यापैकी एक गाडी मोतिहारी ते दिल्ली दरम्यान धावेल. पंतप्रधान मोदी यांनी समस्तीपूर-बछवाडा रेल्वे विभागावरील स्वयंचलित सिग्नलिंग सुविधा राष्ट्राला समर्पित केली. याशिवाय, दरभंगा-थलवाडा आणि समस्तीपूर-रामभद्रपूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, जे ५८० कोटी रुपयांच्या दरभंगा -समस्तीपूर दुहेरीकरण प्रकल्पाचा एक भाग आहे. यामुळे गाड्यांचा विलंब कमी होईल आणि वेग वाढेल.

Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.