ॲप आधारित कॅब चालकांचा संप तूर्तास मागे

मागण्या पूर्ण न झाल्यास बुधवारपासून पुन्हा संपाचा इशारा


मुंबई : आपल्या विविध मागण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून अ‍ॅप आधारित कॅबचालकांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू होता. परंतु, यावर कोणताच तोडगा निघू न शकल्याने व संपातही मतभेद निर्माण झाल्याने रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित केलेले दर सर्व अ‍ॅप आधारित सेवेसाठी लागू केले जावेत ही कॅबचालकांची प्रमुख मागणी होती. मात्र, अद्याप ही मागणी मान्य झाली नसल्याने, मुंबईतील अ‍ॅप आधारित कॅब चालकांनी प्रति किमी ३२ रुपये प्रमाणे भाडे आकारून, प्रवाशांना सेवा देण्याचे ठरवले आहे. मंगळवारपर्यंत आरटीओने सकारात्मक निर्णय न घेतल्यास, बुधवारपासून पुन्हा संप सुरू राहील, असा इशारा महाराष्ट्र कामगार सभा या संघटनेद्वारे दिला आहे.


ओला, उबेरसारख्या अ‍ॅप आधारित टॅक्सी चालकांना प्रतिकिमी ८ ते १२ रुपये भाडे दिले जात होते. त्यामुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित केलेले दर सर्व अ‍ॅप आधारित सेवेसाठी लागू केले जावे, अशी मागणी राज्यभरातील चालकांद्वारे केली जात होती. यासाठी आझाद मैदानात संप आणि अनिश्चित कालावधीसाठी उपोषण सुरू होते. परंतु, या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत होता. यादरम्यान, नालासोपाऱ्यातील एका अ‍ॅप आधारित कॅब चालकाने आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केली व संप करण्यांमध्ये मतभेद निर्माण झाले.


शुक्रवारी अ‍ॅप आधारित कॅब चालक, त्यांचे नेते आणि आरटीओचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत चालकांच्या समस्या, मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. अनिश्चित भाडेदरामुळे चालकांना दैनंदिन गरजा भागवणे कठीण जात आहे. त्यामुळे आरटीओने निश्चित केलेल्या दरानुसार, भाडे ठरवावे, अशी चालकांनी मागणी केली. या मागण्यांबाबत आरटीओ विचार करून मंगळवारपर्यंत निर्णय घेणार आहे.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी