हिमाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टीमुळे ११६ जणांचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत १२३० कोटी रुपयांचे नुकसान


शिमला: हिमाचल प्रदेशात यंदा मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अतिवृष्टीमुळे गेल्या महिनाभरात झालेल्या विविध घटनांमुळे ११६ जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाने दिली.


राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एसडीएमए) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २० जून ते १८ जुलै या कालावधीत पावसाशी संबंधित आपत्ती आणि अपघातांमध्ये ११६ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. या एकूण मृतांपैकी ६८ जणांचा मृत्यू थेट पावसाशी संबंधित घटनांमध्ये झाला आहे. त्यामध्ये ३३ वेगवान पूर (Flash Floods), २२ ढगफुटी (Cloudburst), आणि १९ दरड कोसळणे (Landslides) यांचा समावेश आहे. फ्लॅश फ्लड्स आणि ढगफुटीमध्ये प्रत्येकी १४ जणांचा मृत्यू, बुडाल्यामुळे १२ जणांचे प्राण गेले, विजेचा धक्का बसून ५ जणांचा मृत्यू झाला, तर दरड कोसळल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याशिवाय साप चावणे, तसेच इतर कारणांनी २२ मृत्यू झाले आहेत.


पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, घसरट चढ-उतार, दरड कोसळणे आणि कमी दृश्यता यामुळे राज्यात ४८ रस्ते अपघातांचे बळी गेले आहेत. सोलानमध्ये ८, कुल्लूमध्ये ७, चंबामध्ये ६ आणि शिमलामध्ये ४ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. हिमाचलमधील मंडी, कांगडा, कुल्लू आणि लाहौल-स्पीती हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. मंडी आणि कांगडा येथे प्रत्येकी १६ जणांचा मृत्यू, तर कुल्लूमध्ये ७ जणांचे प्राण गेले आहेत.


मुसळधार पाऊस, भूस्खलन, महापूराच्या आपत्तीमुळे राज्यातील सार्वजनिक पायाभूत सुविधा, घरे, शेती, पशुधन आणि दळणवळण यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. एकूण आर्थिक नुकसान १२३० कोटी रुपये इतके असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. राज्यात सध्या एनडीआरएफ, एसडीआरएफ, होम गार्ड्स आणि स्थानिक प्रशासनामार्फत बचाव आणि पुनर्स्थापना कार्य सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना अत्यावश्यक नसल्यास डोंगराळ भागात प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे तसेच स्थानिक हवामान आणि आपत्ती विषयक सूचना व सल्ल्यांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

राष्ट्रपतींनी हेलिकॉप्टर 'प्रचंड'मधून केले उड्डाण

जैसलमेर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथून स्वदेशी विकसित लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर

WhatsApp लॉगिन फेल, मेसेज मिळेनात! मेसेजिंग अॅपमध्ये तांत्रिक बिघाडामुळे कामं ठप्प

WhatsApp वेब वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यात लॉग-इन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. Downdetector या संकेतस्थळावर या

Yogi Adityanath : सिंगापूर - जापान दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांनी केले ₹९०,००० कोटींचे सामंजस्य करार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सिंगापूर आणि जपानचा चार दिवसांचा दौरा पूर्ण केला. दोन्ही

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान