अमेरिकेने TRF वर घातली बंदी, चीनच्या भूमिकेमुळे तर तीन ताड उडाला पाकिस्तान


इस्लामाबाद : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २५ पर्यटक आणि एक पर्यटकांचा सहाय्यक अशा २६ जणांची पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट अर्थात टीआरएफने हत्या केली. अतिरेक्यांच्या गोळीबारात २६ निरपराध ठार झाले. याला उत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर केले. पाकिस्तानमधील निवडक अतिरेकी तळांवर भारताने हल्ले केले. तर अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने द रेझिस्टन्स फ्रंट अर्थात टीआरएफ या अतिरेकी संघटनेवर बंदी घातली आहे.



अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी द रेझिस्टन्स फ्रंट अर्थात टीआरएफला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलंय. त्यामुळे टीआरएफ या दहशतवादी संघटनेची क्रूरता जगासमोर आलीय. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे केलेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असलेल्या टीआरएफ या संघटनेने स्वीकारली. याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली. भारतानं ही कारवाई दहशतवादाविरुद्ध 'जीरो टॉलरन्स' धोरणाचा भाग असल्याचं स्पष्ट केलं.


भारताच्या ऑपरेशन सिंदूरला जगातील अनेक देशांचा पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा TRF संदर्भातला निर्णय आला आहे. भारताने या निर्णयाचे स्वागत केले आहे. एरवी पाकिस्तानला साथ देणाऱ्या चीननेही अमेरिकेच्या TRF वर बंदी घालण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. यामुळे पाकिस्तानला धक्का बसला आहे.


Comments
Add Comment

योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'

काठमांडू : भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये मागील ४-५ वर्षात अस्थिरता निर्माण झाली आहे. आधी अफगाणिस्तान,

नेपाळच्या कम्युनिस्ट सरकारचा पाडाव; रस्त्यावर आली तरुणाई, कम्युनिस्ट सरकारला खेचले खाली

काठमांडू : आधी सोशल मीडिया बंदी विरोधात रस्त्यावर आलेल्या तरुणाईने नंतर भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात हिंसक

नेपाळच्या पंतप्रधानांचा राजीनामा, दुबईला पळून जाण्याची शक्यता

काठमांडू : भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात तरुणाईने हिंसक आंदोलन सुरू केले आहे. याआधी

नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदी मागे, हिंसक आंदोलनानंतर सरकारचा निर्णय

काठमांडू: नेपाळ सरकारने देशात सुरू असलेल्या तीव्र आणि हिंसक आंदोलनानंतर अखेर फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम

आनंदाची बातमी, रशियाने विकसित केली कॅन्सरला हरवणारी लस

मॉस्को : कर्करोग म्हणजे कॅन्सर. कॅन्सर हा आजार झाला की रुग्ण आणि त्याचे नातलग निराश होतात. हे नैराश्यच अनेकदा

परदेशातही गणेशोत्सव उत्साहात

बाप्पाचा जयघोष आणि गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी भूमीवर भारतीय संस्कृतीचे दर्शन क्वालालंपूर: भारतातील