महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजणार ?


मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होईल तसेच गुरुवारी संध्याकाळी विधानभवनात झालेल्या हाणामारीवरुन आरोपप्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.


सत्ताधारी आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये गुरुवारी संध्याकाळी विधानभवनात हाणामारी झाली. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज बारकाईने तपासावे आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यामुळे हाणामारीच्या मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक शुक्रवारी सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे.


याआधी विधानभवनात गुरुवारी राडा झाल्यानंतर मध्यरात्री जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलिसांनी अटक केली. रात्री साडे तीन वाजता नितीन देशमुख याला जे जे मध्ये मेडिकलसाठी नेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले. नितीन देशमुखला घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड हे पोलिसांच्या गाडीसमोर आडवे झोपले. यावेळी पोलिसांनी त्यांना अक्षरश: खेचून बाहेर काढले.


पडळकरांनी मागितली माफी


आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानभवनात घडलेल्या घटनेप्रकरणी पत्रकारांशी बोलताना जाहीर माफी मागितली. विधानसभाध्यक्ष गुरुवारच्या घटनेप्रकरणी जो निर्णय देतील तो स्वीकारणार, असेही गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले.


Comments
Add Comment

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.