महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजणार ?


मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होईल तसेच गुरुवारी संध्याकाळी विधानभवनात झालेल्या हाणामारीवरुन आरोपप्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.


सत्ताधारी आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये गुरुवारी संध्याकाळी विधानभवनात हाणामारी झाली. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज बारकाईने तपासावे आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यामुळे हाणामारीच्या मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक शुक्रवारी सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे.


याआधी विधानभवनात गुरुवारी राडा झाल्यानंतर मध्यरात्री जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलिसांनी अटक केली. रात्री साडे तीन वाजता नितीन देशमुख याला जे जे मध्ये मेडिकलसाठी नेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले. नितीन देशमुखला घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड हे पोलिसांच्या गाडीसमोर आडवे झोपले. यावेळी पोलिसांनी त्यांना अक्षरश: खेचून बाहेर काढले.


पडळकरांनी मागितली माफी


आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानभवनात घडलेल्या घटनेप्रकरणी पत्रकारांशी बोलताना जाहीर माफी मागितली. विधानसभाध्यक्ष गुरुवारच्या घटनेप्रकरणी जो निर्णय देतील तो स्वीकारणार, असेही गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले.


Comments
Add Comment

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक