निवडणुका जवळ येतील, तशी युतीबाबतची चर्चा - उद्धव ठाकरे

मुंबई :“सध्या राज आणि मी मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आलो आहोत. त्यामुळे आत्ताच आम्ही एकच आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतशी युतीबाबतची चर्चा सुरू होईल, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते मुंबईत शुक्रवारी पत्रकार परिषद बोलत होते

हिंदी सक्तीच्या विरोधात आयोजित केलेल्या विजयी मेळाव्याला पंधरा दिवस उलटले असले तरी ठाकरे बंधूंची औपचारिक राजकीय युती अद्याप जाहीर झालेली नाही. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेली मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी युती होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

इगतपुरी येथे मनसेच्या मेळाव्यात युतीबाबत राज ठाकरे काही बोलणार का, याची उत्सुकता होती. मात्र, त्यांनी याविषयी कोणतेही भाष्य केले नाही. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत सूचक वक्तव्य केले आहे.यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आणखी बळावली आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत हिंदी सक्तीविषयी स्पष्ट भूमिका मांडली. “मुख्यमंत्री असताना मी हिंदी सक्तीची अंमलबजावणी केली नव्हती. माशेलकर अहवाल सादर झाला, पण तो स्वीकारलेला नाही. कोणत्याही भाषेची सक्ती राज्यात लागू होऊ देणार नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष टोला लगावला.


Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर