निवडणुका जवळ येतील, तशी युतीबाबतची चर्चा - उद्धव ठाकरे

मुंबई :“सध्या राज आणि मी मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आलो आहोत. त्यामुळे आत्ताच आम्ही एकच आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतशी युतीबाबतची चर्चा सुरू होईल, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते मुंबईत शुक्रवारी पत्रकार परिषद बोलत होते

हिंदी सक्तीच्या विरोधात आयोजित केलेल्या विजयी मेळाव्याला पंधरा दिवस उलटले असले तरी ठाकरे बंधूंची औपचारिक राजकीय युती अद्याप जाहीर झालेली नाही. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेली मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी युती होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

इगतपुरी येथे मनसेच्या मेळाव्यात युतीबाबत राज ठाकरे काही बोलणार का, याची उत्सुकता होती. मात्र, त्यांनी याविषयी कोणतेही भाष्य केले नाही. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत सूचक वक्तव्य केले आहे.यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आणखी बळावली आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत हिंदी सक्तीविषयी स्पष्ट भूमिका मांडली. “मुख्यमंत्री असताना मी हिंदी सक्तीची अंमलबजावणी केली नव्हती. माशेलकर अहवाल सादर झाला, पण तो स्वीकारलेला नाही. कोणत्याही भाषेची सक्ती राज्यात लागू होऊ देणार नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष टोला लगावला.


Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य