रेल्वेच्या 'गारेगार' प्रवासाची मिळणार सर्वसामान्यांनाही संधी?

मुंबई (प्रतिनिधी) : एसी लोकलचे तिकीट दर साध्या लोकलसारखे होण्यासाठी राज्य सरकारने केंद्रात बोलणी सुरू केल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.


लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना मुंबईतील सर्वसामान्यांचा प्रवास गारेगार होण्याची शक्यता आहे. मुंबईतील एसी लोकल ट्रेनचे तिकीट दर साध्या लोकल तिकीट दरासारखे करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे बोलणी सुरू केल्याची माहिती विधानसभेत मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


मुंबईत एसी लोकलला साध्या लोकलचे दर लावता येतील, याविषयी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबई लोकल ट्रेनबाबत माहिती देताना मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, मुंबई लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेसह वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्यात येत आहे. यावेळी मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची रेल्वेमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे मंत्री सरनाईक म्हणाले.

Comments
Add Comment

रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून

मध्यप्रदेशच्या तरुणांनी महापालिकेच्या वाहनतळाचा घेतला ताबा... महापालिकेने उचलले हे पाऊल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हुतात्मा चौक येथील वाहनतळाच्याठिकाणी महापालिकेच्यावतीने निशुल्क सेवा दिली जात

मुंबई विमानतळावर विमानांचा मोठा अपघात टळला

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

स्वच्छ सर्वेक्षण २०२६; शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हा, नागरिकांना मुंबई मनपाचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या

सी-टीईटी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

मुंबई : ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत साधणार मान्यवरांशी संवाद - वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत हे मुंबईत समाजातील विविध