रेल्वेच्या 'गारेगार' प्रवासाची मिळणार सर्वसामान्यांनाही संधी?

मुंबई (प्रतिनिधी) : एसी लोकलचे तिकीट दर साध्या लोकलसारखे होण्यासाठी राज्य सरकारने केंद्रात बोलणी सुरू केल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.


लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना मुंबईतील सर्वसामान्यांचा प्रवास गारेगार होण्याची शक्यता आहे. मुंबईतील एसी लोकल ट्रेनचे तिकीट दर साध्या लोकल तिकीट दरासारखे करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे बोलणी सुरू केल्याची माहिती विधानसभेत मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.


मुंबईत एसी लोकलला साध्या लोकलचे दर लावता येतील, याविषयी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबई लोकल ट्रेनबाबत माहिती देताना मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, मुंबई लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेसह वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्यात येत आहे. यावेळी मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची रेल्वेमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे मंत्री सरनाईक म्हणाले.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल