सर्वदूर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाची मोखाड्यात मात्र विश्रांती

  40

भात लावणीसाठी शेतात पाण्याची व्यवस्था करताना शेतकरी


भात, वरई पिकांची लागवड खोळंबली


मोखाडा : राज्यात सगळीकडे मुसळधार पडणारा पाऊसाने मोखाडा शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. सकाळी व सायंकाळी दहा पंधरा मिनिटे तुरळक पाऊस पडत असून दुपारच्या वेळी तर आकाश निरभ्र होत असून उकाडा जाणवत आहे.


यामुळे तयार झालेल्या भात, वरई पिकांची लागवड खोळंबली आहे. दिवसभर मुसळधार पाऊस न पडता अधुनमधून अर्धा एक तास मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांने सुध्दा आपल्या शेतात भात, वरई या पिकांची लागवड करायला सुरुवात केली होती. परंतु गेल्या दोन तीन दिवसांपासून सकाळी एकदा दहा पंधरा मिनिटे हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला की, दिवसभर पाऊस पडत नाही. आकाश पुर्णतः निरभ्र राहत आहे.


यामुळे शेतात लागवडीस तयार झालेल्या भात पीकाची लावणी मात्र खोळंबली आहे. तर काही शेतकऱ्यांनी शेजारील शेतातील पाणी आपल्या शेतात घमेले, बादलीच्या सहाय्याने आणून लागवड चालू ठेवली आहे. त्याचप्रमाणे चालू वर्षी कामांवर येणाऱ्या मजूरांची मजुरी दोनशे पन्नास वरून तीनशे रुपयांवर गेल्याने भरीव शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शेती परवडेनासे झाली असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहे.


एरवी शेतकरी पुनर्वसु नक्षत्रात हळवी भाताची शेतात लागवड पूर्ण करून वरई पिकाची लागवड करायला घेतो. मात्र यंदा पाहिजे तसा पाऊस सुरूवातीला पडल्याने ऐन लागवडीच्या काळात मात्र पाऊसाने उघडीप दिली आहे. यामुळे अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हळवी भाताची लागवड केलेली नसून जोरदार पावसाची वाट बघत
असल्याचे चित्र तालुक्याच्या ग्रामीण
भागात दिसून येत आहे.

Comments
Add Comment

पालिका अधिकाऱ्याकडे ३१ कोटींची अपसंपदा

लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल विरार  : वसई-विरार महापालिकेचे निलंबित उपसंचालक नगररचना वाय.एस. रेड्डी

जिल्ह्याची कृषिप्रधान ओळख मिटण्याची चिन्हे

वसंत भोईर वाडा : शासनाच्या शेतीकडे पाहण्याच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील पारंपरिक शेतीव्यवसाय अडचणीत आला

अवैध बांधकामांना माजी आयुक्तच जबाबदार

‘ईडी’ कार्यालयाकडून भांडाफोड विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या घोटाळ्यामध्ये अनिलकुमार पवार

वसईत 'भूतांचा' अनोखा आंदोलन: स्मशानभूमी वाचवण्यासाठी प्रयत्न!

मुंबई : मुंबईपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसईत, स्थानिकांनी एका अनोख्या आणि सर्जनशील पद्धतीने

घोडबंदर ते तलासरी महामार्ग धोकादायक स्थितीत

तातडीने लक्ष द्यावे अशी खासदारांची मागणी वाडा : पालघर लोकसभा मतदारसंघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८

प्रियकरासोबत रंगेहाथ सापडल्याने पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक

घरातच गाडले, भावानेच घरातील फरशा बदलल्या नालासोपारा : नालासोपारा येथे प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले गेल्यानंतर