बेवड्याची कमाल! पुलावरून ७० फुट खाली कोसळला; लोक घाबरले, पण तो मात्र...

अमरावती : अमरावती मधी वलगांव येथे नव्याने पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. या पुलाला संरक्षक कठडे नसल्याने दारूच्या नशेत धुंद व्यक्ती ७० फूट खाली पडला. मात्र, नंतर या बेवड्याने सर्वांना चकित करणारा थरारक प्रकार घडवला. पुलावरून तब्बल ७० फुट खाली हा इसम कोसळला. तेथे उपस्थित नागरिकांनी धैर्य दाखवत त्याला खांद्यावर उचलून रस्त्यावर आणले. पण यानंतर घडलेल्या प्रकाराने सर्वांचे डोळे विस्फारले!


रस्त्यावर आणल्यानंतर हा इसम नशेत नागमोडी चालत स्वत:च्या पायाने गाडीकडे निघाला. असं की त्याला काहीच झालं नाही. उपस्थित लोकांनी या बेपर्वा वृत्तीवर संताप व्यक्त केला. पण तो नशेत तरर्र असल्याने काही पावलं चालताच पुन्हा जमिनीवर कोसळला.


यावेळी वलगांव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि या व्यक्तीला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. हा प्रकार परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.सदर ईसम हा दुचाकीने अमरावतीहून परतवाडाकडे जात होता. नव्याने बांधलेल्या वलगांव येथील पुलाचा सुरूवातीला आणि शेवटी संरक्षक कठडे नसल्याने तोल जाऊन हा अपघात घडला.

Comments
Add Comment

Mumbai Goa National Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर अल्टो कार २५ फूट दरीत कोसळली; पाच जण गंभीर जखमी

Jalna Bribe Case : पार्टी सुरू व्हायच्या आधीच वाजले बारा! एसीबीने जालनाच्या तहसीलदारांच्या घरात टाकला छापा

जालना: जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण यांना लाच (Bribe) स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक

Chitra Wagh : डहाणूतील संतापजनक प्रकरणावर चित्रा वाघ आक्रमक; दोन बहिणींवरील अत्याचारप्रकरणी कठोर कारवाईची मागणी

डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे घडलेल्या एका लव्ह जिहादच्या गंभीर प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या

Nashik TCS Case : नाशिकमधील आयटी कंपनीशी संबंधित प्रकरणात नवा दावा; निदा खानने केला 'त्या' घटनेचा खुलासा

नाशिक : नाशिकमधील एका आयटी कंपनीशी संबंधित कथित लैंगिक छळ (sexual harassment) आणि धर्मांतर प्रकरणाचा (Religious conversion) तपास सुरू

Satara Murder: कराडमध्ये शासकीय अभियंत्याची हत्या; सुपारी देऊन रचला कट, जवळच्या नातेवाईकांना अटक

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) शहरात एका शासकीय अभियंत्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या

MPSC EXAM : MPSC परीक्षार्थींसाठी महत्त्वाचे! आता परीक्षा केंद्रावर दीड तास आधी पोहोचणे अनिवार्य; नवीन नियमावली जाहीर

NAGPUR: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या शिस्तपालनासाठी आयोगाने कडक पावले उचलली