विधानसभेत गाजला हनीट्रॅपचा मुद्दा, पटोलेंनी दाखवला पेनड्राईव्ह


मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. विधानसभेत गुरुवारी हनीट्रॅपचा मुद्दा उपस्थित झाला. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला. 'मुंबईत मंत्रालय, तसेच नाशिक आणि ठाणे जिल्हा ही हनीट्रॅपची केंद्र झाली आहेत. राज्यातील किमान ७२ महत्त्वाच्या व्यक्ती हनीट्रॅपला बळी पडल्या आहेत. राज्याशी संबंधित महत्त्वाची माहिती हनीट्रॅपमुळे आता चुकीच्या लोकांच्या हाती पडली आहे. महाराष्ट्राची बदनामी होत आहे. या बाबत महाराष्ट्र शासनाचे मंत्री काही उत्तरही दे नाहीत' असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला.


हनीट्रॅपमुळे राज्यातील गोपनीय शासकीय कागदपत्रे आणि माहिती चुकीच्या लोकांच्या हाती पडली आहे. गोपनीय माहिती राज्याबाहेर गेली आहे. काही आयएसएस अधिकारी, मंत्री हे पण हनीट्रॅपला बळी पडल्याचा आरोप करत नाना पटोले यांनी सभागृहात एक पेनड्राईव्ह दाखवला. पेनड्राईव्ह दाखवून कोणाचे चरित्रहनन करायचे नाही. पण एवढ्या गंभीर प्रश्नावर सरकार साधे निवेदनही करत नाहीत. या राज्यात नेमके काय सुरु आहे ? असा प्रश्न नाना पटोलेंनी उपस्थित केला.


नानांच्या वक्तव्यावर राज्य शासनाने पावसाळी अधिवेशन संपण्याआधी निवेदन द्यावे, असे निर्देश विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. तर विधानसभाध्यक्षांच्या आदेशाचे पालन होईल असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्य शासनाने आरोप गांभीर्याने घेतले आहेत, असेही ते म्हणाले.


राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्यानंतरही शिउबाठाचे आमदार भास्कर जाधव उभे राहिले आणि म्हणाले, “गुरुवारी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी माध्यमांसमोर जाहीर विधान केले आहे की, नाशिकच्या आणि ठाण्याच्या माणसानेसुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली. सेटलमेंट करून प्रकरण मिटवले आहे. तर आता उपमुख्यमंत्री म्हणतात की, आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेऊ. हे सरकार सभागृहाचे आणि राज्याच्या जनतेची दिशाभूल करत आहे का?” असा गंभीर आरोप केला. यावर स्पष्टीकरण देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्टीकरण दिले की, “मी ज्या प्रकरणाची माहिती दिली ते वेगळे प्रकरण आहे. ती तक्रार हनीट्रॅपची नव्हती.” यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. भास्कर जाधव यांनी आमच्याकडे नावे असल्याचा दावा केला. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.


Comments
Add Comment

NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

Iran - America War : “शांतता नाहीतर विनाश”; अमेरिकेची इराणला थेट युद्धाची चेतावणी, मध्यपूर्वेत तणाव वाढला

इराणच्या अणुकार्यक्रमावरून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा धोकादायक वळणावर पोहोचला आहे.

रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक; मंत्री आदिती तटकरे

मुंबई :  रस्त्यावर राहणाऱ्या, अनाथ, एकल आणि दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ पथदर्शी योजना सहा

अजित पवार गटातील २२ आमदारांनी घेतली शरद पवारांची गुप्त भेट?

तर्कवितर्कांना उधाण; पक्षाची राजकीय दिशा ठरत नसल्याने संभ्रमावस्था मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत