सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिराची मुभा कर्मचाऱ्यांना

मुंबई : मुंबईतील रेल्वे वाहतुकीवर येणारा ताण कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर विविध उपाययोजनांचा विचार केला जात असतानाच सरकारी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिराने येण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी विधानसभेत दिली. त्याचवेळी या कर्मचाऱ्यांना वाढीव अर्धा तास काम करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणाचे पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. आमदार अतुल भातखळकर यांनी या संदर्भातील लक्षवेधी मांडली. त्यावर उत्तर देताना प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. 'मुंबई रेल्वे वाहतुकीवरील ताण वाढता आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आज लोकल पकडण्यासाठी रेल्वे प्रवासी जीव धोक्यात घालत आहेत. त्यातूनच मुंब्रा अपघातासारखी घटना घडली. प्राप्त



राज्य सरकारची विधानसभेत माहिती


'खासगी' कर्मचाऱ्यांच्या वेळेबाबत 'टास्क फोर्स'


'खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांच्या वेळेत करण्यासंदर्भात लवकरच 'टास्क फोर्स' तयार केले जाणार आहे,' अशी घोषणाही सरनाईक यांनी विधानसभेत केली. बदल आकडेवारीनुसार, मुंबईत विविध रेल्वे अपघातांत ७ हजार ५६५ प्रवाशांचा मृत्यू झाला. सुमारे ७ हजार २०० प्रवासी जखमी झाले असून ही बाब भूषणावह नाही. त्यामुळे या घटना कमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो रेल्वेशिवाय इतर वाहतूक पर्यायांचा वापर करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे,' असे सरनाईक यांनी यावेळी नमूद केले.



बंद दरवाजांच्या रेल्वेसंख्येत वाढ ?


'एसी लोकल आणि सामान्य लोकलचे तिकिटाच्या दरात तफावत आहे. त्यात सुसूत्रता आणून जास्तीत जास्त बंद दरवाजांच्या रेल्वेच्या संख्येत वाढ करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करत आहेत,' अशी माहितीही सरनाईक यांनी सभागृहात दिली. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



पॉट टॅक्सी आणि जलवाहतुकीचा विचार


'राज्य सरकारने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. मुंबईत प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी सरकारने जलवाहतूक, पॉट टॅक्सी आणि रोप वे यांसारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा विचार सुरू केला आहे. परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना करणार आहे,' अशी माहिती सरनाईक यांनी यावेळी दिली.

Comments
Add Comment

Pune International Airport : ‘बॉम्ब’ची चिठ्ठी अन् पुणे विमानतळावर खळबळ! उड्डाणापूर्वी विमान रिकामं, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडल्याने काही काळासाठी खळबळ उडाली.

Bhimashankar Temple Reopening Date : भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून दर्शनासाठी खुले; ऑनलाईन पास अनिवार्य, जाणून घ्या नवे नियम

पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले होणार आहे. गेल्या

Bhivandi : भिवंडीत 'मिथेनॉल'चा मोठा साठा जप्त; आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार एफडीएची धडक कारवाई

मुंबई, दि. ३० : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर येथे विषारी गावठी दारूच्या सेवनामुळे

अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

विद्यार्थ्यांना दिलासा मुंबई, दि. ३० : राज्यातील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांना

Eknath Shinde : अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्शाने राज्याचा विकास

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी योगदान देणे माझे भाग्य- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे यांच्या

Big Action on Gutkha Mafia : गुटखा माफियांवर तुकाराम मुंढेंचा मोठा प्रहार! एका दिवसात ३३ जण अटकेत, २८ आस्थापना सील

मुंबई : प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या अवैध विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात मोठी मोहीम