आषाढी यात्रेदरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांकडून कोट्यवधी रुपयांचे दान

पंढरपूर : यंदाच्या आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी १० कोटी ८४ लाख रुपयांचे दान केले. तसेच सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले आहेत. मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्त निवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.


गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले कि, यंदा आषाढी कालावधीत दर्शन रांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ व जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना मंदिर समितीने केल्या होत्या. यंदाच्या वारीत २६ जून ते १० जुलै या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ ७५ लाख ५ हजार २९१ रुपये अर्पण केले तर २ कोटी ८८ लाख ३३ हजार ५६९ रुपये देणगी, ९४ लाख ४ हजार ३४० रुपये लाडू प्रसाद विक्री, ४५ लाख ४१ हजार ४५८ रुपये भक्तनिवास, १ कोटी ४४ लाख ७१ हजार ३४८ रुपये हुंडीपेटी, ३२ लाख ४५ हजार ६८२ रुपये परिवार देवता तसेच २ कोटी ५९ लाख ६१ हजार ७६८ रुपये सोने-चांदी अर्पण, अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्र, फोटो, मोबाइल लॉकर आदी माध्यमांतून १२ लाख ४५ हजार ७५ रुपये व ३ इलेक्ट्रिक रिक्षा / बसचे ३२ लाख इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.


मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ ७७ लाख ६ हजार ६९४ रुपये अर्पण, २ कोटी ६९ लाख २२ हजार ५७८ रुपये देणगी, ९८ लाख ५३ हजार रुपये लाडू प्रसाद विक्री, ५० लाख ६० हजार ४३७ रुपये भक्तनिवास, ९३ लाख ५५ हजार ७३ रुपये हुंडीपेटी, ३१ लाख ७९ हजार ६८ रुपये परिवार देवता तसेच २ कोटी २१ लाख ५३ हजार ६०१ रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाइल लॉकर आदी माध्यमांतून ६ लाख २८ हजार १०९ रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे.सन २०२४ च्या आषाढी यात्रेत ८ कोटी ४८ लाख ५८ हजार ५६० रुपये व यावर्षीच्या यात्रेत १० कोटी ८४ लाख ८ हजार ५३१ इतके उत्पन्न प्राप्त असून, मागील यात्रेच्या तुलनेत २ कोटी ३५ लाख ४९ हजार ९७१ इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या या दानातून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका; आजच्या बैठकीत काय घडलं ?

(Marathi Language Compulsory Taxi-Auto ) : आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य