आषाढी यात्रेदरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांकडून कोट्यवधी रुपयांचे दान

पंढरपूर : यंदाच्या आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी १० कोटी ८४ लाख रुपयांचे दान केले. तसेच सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले आहेत. मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्त निवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.


गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले कि, यंदा आषाढी कालावधीत दर्शन रांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ व जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना मंदिर समितीने केल्या होत्या. यंदाच्या वारीत २६ जून ते १० जुलै या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ ७५ लाख ५ हजार २९१ रुपये अर्पण केले तर २ कोटी ८८ लाख ३३ हजार ५६९ रुपये देणगी, ९४ लाख ४ हजार ३४० रुपये लाडू प्रसाद विक्री, ४५ लाख ४१ हजार ४५८ रुपये भक्तनिवास, १ कोटी ४४ लाख ७१ हजार ३४८ रुपये हुंडीपेटी, ३२ लाख ४५ हजार ६८२ रुपये परिवार देवता तसेच २ कोटी ५९ लाख ६१ हजार ७६८ रुपये सोने-चांदी अर्पण, अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्र, फोटो, मोबाइल लॉकर आदी माध्यमांतून १२ लाख ४५ हजार ७५ रुपये व ३ इलेक्ट्रिक रिक्षा / बसचे ३२ लाख इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.


मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ ७७ लाख ६ हजार ६९४ रुपये अर्पण, २ कोटी ६९ लाख २२ हजार ५७८ रुपये देणगी, ९८ लाख ५३ हजार रुपये लाडू प्रसाद विक्री, ५० लाख ६० हजार ४३७ रुपये भक्तनिवास, ९३ लाख ५५ हजार ७३ रुपये हुंडीपेटी, ३१ लाख ७९ हजार ६८ रुपये परिवार देवता तसेच २ कोटी २१ लाख ५३ हजार ६०१ रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाइल लॉकर आदी माध्यमांतून ६ लाख २८ हजार १०९ रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे.सन २०२४ च्या आषाढी यात्रेत ८ कोटी ४८ लाख ५८ हजार ५६० रुपये व यावर्षीच्या यात्रेत १० कोटी ८४ लाख ८ हजार ५३१ इतके उत्पन्न प्राप्त असून, मागील यात्रेच्या तुलनेत २ कोटी ३५ लाख ४९ हजार ९७१ इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या या दानातून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक