Devendra Fadanvis : खोटी कागदपत्रे दाखवून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या धर्मांतरित ख्रिश्चनांवर कठोर कारवाई करणार मुख्यमंत्र्यांचा इशारा

धर्मांतरणाविरुद्ध कायदा आणणार : मुख्यमंत्री फडणवीस


मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, खोटी कागदपत्रे दाखवून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या धर्मांतरित ख्रिश्चनांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिला. खोटी प्रमाणपत्रे देऊन सरकारी नोकरी किंवा निवडणुकीत आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द केले जाईल. तसेच, बळजोरीने, प्रलोभनाने किंवा फसवणुकीने धर्मांतरण करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदा आणला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर ते बोलत होते. आ. चित्रा वाघ, प्रवीण दरेकर आणि उमा खापरे यांनी चर्चेत भाग घेतला. गोरखे यांनी सांगितले की, राज्यात ‘क्रिप्टो-ख्रिश्चन’ लोक गुप्तपणे अनुसूचित जाती/जमाती, भटक्या आणि विमुक्त जातींचे धर्मांतरण करत आहेत. हे लोक कागदोपत्री हिंदू धर्म आणि जातीचा वापर करून शिक्षण, नोकरी आणि निवडणुकीत आरक्षणाचा लाभ घेतात. नंदुरबार, सांगली, कोल्हापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत असे प्रकार घडत असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाच्या नोव्हेंबर २०२४ च्या निर्णयानुसार, अनुसूचित जातीचे आरक्षण केवळ हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मीयांनाच मिळू शकते. त्यामुळे ‘क्रिप्टो-ख्रिश्चन’ लोकांवर कायदेशीर कारवाईची मागणी त्यांनी केली.


शारीरिक आणि मानसिक छळ


आमदार चित्रा वाघ यांनी सांगलीतील ऋतुजा पाटील प्रकरणाचा उल्लेख केला. ऋतुजाचा पती ख्रिश्चन असल्याचे तिला विवाहानंतर कळले. तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ झाला, ज्यामुळे तिने गर्भवती असताना आत्महत्या केली. तसेच, छत्रपती संभाजीनगर येथील बाल वसतिगृहात मुलींना बळजोरीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे धर्मांतरणविरोधी कायदा आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

आमदार उमा खापरे यांनी पंडित रमाबाई मिशनसारख्या संस्थांवर मुलींना बळजोरीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडणे, मारहाण आणि शौचालये साफ करण्यासारखे प्रकार केल्याचा आरोप केला. अशा संस्थांची चौकशी आणि कारवाईची मागणी त्यांनी केली. भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून गरिबांना प्रलोभने देऊन धर्मांतरण केले जात असल्याचे सांगितले. पोलिस धार्मिक वाद टाळण्यासाठी कारवाई करत नसल्याचा आरोप करत, धर्मांतरण रोखण्यासाठी उपाययोजनांची मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन


या लक्षवेधील उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या देशात स्वच्छेने कोणताही धर्म स्वीकारायला बंदी नाही; मात्र प्रलोभने दाखवून आणि बळजोरीने धर्मांतरण मान्य नाही. धर्मांतरणाच्या घटना घडतात ही वस्तुस्थिती आहे. २६ नोव्हेंबर २०२४ ला सर्वाेच्च न्यायालयाने निर्णय दिला की, शेड्युअल जातीचे आरक्षण हे केवळ हिंदु, बौद्ध आणि शीख हेच घेऊ शकतात. इतर धर्मीय ते घेऊ शकत नाहीत. बळजोरीने किंवा फसवणूक एखाद्याचे धर्मांतरण होत असेल, ते संविधान आणि कायद्याला मान्य नाही, ती चुकीची कृती आहे. प्रलोभने, आमिषे दाखवून धर्मांतरण होत असेल, तर ते मान्य नाही. गरीब लोकांचे धर्मांतरण होते, ही वस्तुस्थिती आहे.

धर्मांतरणामध्ये सरसकट सर्व संस्थांची चौकशी किंवा कारवाई करण्याची आवश्यकता नाही. विशिष्ट धर्माचे आहेत म्हणून चौकशी करता येत नाही; मात्र ज्या संस्थांच्या धर्मांतरणाच्या संदर्भात तक्रारी येत आहेत, त्या संस्थांची चौकशी करून निश्चित कारवाई केली जाईल. फसवणूक करून आणि दबाव टाकून धर्मांतरण करण्याच्या घटना राज्यात निदर्शनास आल्या आहेत. पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. फसवणूक करून किंवा बळजोरीने अशा प्रकारचे जे धर्मांतरण होते, त्याच्याविरुद्ध कायदा कसा कडक करता येईल, या संदर्भातील शिफारशी त्यांना करायला सांगितल्या होत्या. त्यांनी त्यावर अभ्यास करून त्या संदर्भातील एक अहवाल राज्यशासनाला पाठवला आहे. राज्यशासनाला तो नुकताच प्राप्त झाला आहे. राज्यशासन त्याचा अभ्यास करून त्यात आवश्यक ते पालट करण्यात येतील.
Comments

Sai Pandey    July 17, 2025 06:57 PM

सरकारचं खूप खूप आभार ! भलभलत्या जखमेवर बोट ठेवलंय. बंद करा हे धर्मपरिवर्तनाच्या विषचक्र. ख्रिस्ती म्हणून परदेशी मलई खायची. हिंदू म्हणून हिंदुबंधूंच्या मुळावरचं उरलंसुरलं पण पळवून न्यायचं. खऱ्या दलितांनी, वंचितांनी कुणाकडं पाहायचं! सरकार काही तरी करा आम्हाला न्याय द्या!

Add Comment

Chandrashekhar Bawankule : ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’साठी ९१ विधानसभा मतदारसंघांत 'सह अध्यक्षां'ची नेमणूक; महसूलमंत्री बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’च्या

Harbour Line Block : हार्बर मार्गावर चार दिवस मध्यरात्री विशेष ट्रॅफिक ब्लॉक

काही लोकल सेवा रद्द; प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वे

Cooper Hospital : कूपरच्या प्रसाधनगृहात अर्भकाचा मृतदेह, BMC ने दिली मोठी अपडेट

‘मुंबई Mumbai :  कूपरच्या प्रसाधनगृहात अर्भकाचा मृतदेह’ या विषयाच्या अनुषंगाने विविध प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या

Devendra Fadnavis : छत्रपती संभाजीनगरकरांचा पाणीप्रश्न मिटणार

जायकवाडी पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश मुंबई (Mumbai): छत्रपती संभाजीनगर

Mumbai Crime Branch : मुंबईत बनावट दुधाचा मोठा भांडाफोड; ५७५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त

गोरेगाव पोलीस ठाण्याची मोठी कारवाई, दोघांना अटक मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ११ ने गोरेगाव (Goregaon) पश्चिम

Chandrashekhar Bawankule : वसईतील कोळीवाड्यांना 'गावठाण'चा दर्जा मिळणार

 महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश; कोळीवाड्यांचे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची