नाशिकमध्ये अपघातानंतर कार नाल्यात कोसळली, ७ जणांचा बुडून मृत्यू


नाशिक : नाशिक-वणी रस्त्यावर दिंडोरी बाजार समितीसमोर रात्री कार-दुचाकीची समोरासमोर धडक झाली. धडक झाल्यानंतर कार नाल्यात कोसळली. या अपघातात नाल्याच्या पाण्यात बुडून कारमधील सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन पुरूष, तीन महिला आणि लहान बाळाचा समावेश आहे. सर्व मृत नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातील रहिवासी आहेत.


अपघातात ज्यांचा मृत्यू झाला ते सर्वजण एका वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेले होते. घरी परततेवेळी अपघात झाला. कार आणि दुचाकीची धडक झाली. या धडकेनंतर चालकाने नियंत्रण गमावले आणि कार नाल्यात जाऊन कोसळली. कारमध्ये बसलेल्यांना बाहेर येण्याची संधीच मिळाली नाही. यामुळे कारमध्ये असलेल्या सात जणांचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.


कारमधील देविदास गांगुर्डे (२८, सारसाळे), मनिषा गांगुर्डे (२३, सारसाळे), उत्तम जाधव (४२, कोशिंबे), अलका जाधव (३८, कोशिंबे), दत्तात्रेय वाघमारे (४५, देवपूर, देवठाण), अनुसया वाघमारे (४०, देवपूर, देवठाण), भावेश गांगुर्डे (दोन) यांचा मृत्यू झाला. दुचाकीवरील मंगेश कुरघडे (२५), अजय गोंद (१८, रा. जव्हार, पालघर, सध्या सातपूर, नाशिक) हे जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


Comments
Add Comment

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी