नाशिकमध्ये अपघातानंतर कार नाल्यात कोसळली, ७ जणांचा बुडून मृत्यू


नाशिक : नाशिक-वणी रस्त्यावर दिंडोरी बाजार समितीसमोर रात्री कार-दुचाकीची समोरासमोर धडक झाली. धडक झाल्यानंतर कार नाल्यात कोसळली. या अपघातात नाल्याच्या पाण्यात बुडून कारमधील सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन पुरूष, तीन महिला आणि लहान बाळाचा समावेश आहे. सर्व मृत नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातील रहिवासी आहेत.


अपघातात ज्यांचा मृत्यू झाला ते सर्वजण एका वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेले होते. घरी परततेवेळी अपघात झाला. कार आणि दुचाकीची धडक झाली. या धडकेनंतर चालकाने नियंत्रण गमावले आणि कार नाल्यात जाऊन कोसळली. कारमध्ये बसलेल्यांना बाहेर येण्याची संधीच मिळाली नाही. यामुळे कारमध्ये असलेल्या सात जणांचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.


कारमधील देविदास गांगुर्डे (२८, सारसाळे), मनिषा गांगुर्डे (२३, सारसाळे), उत्तम जाधव (४२, कोशिंबे), अलका जाधव (३८, कोशिंबे), दत्तात्रेय वाघमारे (४५, देवपूर, देवठाण), अनुसया वाघमारे (४०, देवपूर, देवठाण), भावेश गांगुर्डे (दोन) यांचा मृत्यू झाला. दुचाकीवरील मंगेश कुरघडे (२५), अजय गोंद (१८, रा. जव्हार, पालघर, सध्या सातपूर, नाशिक) हे जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


Comments
Add Comment

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा