Laadki Vihin Yojana : 'लाडकी बहीण योजना' गाजली, आता येतेय 'लाडकी विहीण योजना'; निर्मिती सावंत पुन्हा रंगभूमीवर धिंगाणा घालणार!

मुंबई : राज्यात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'ची मोठी हवा असतानाच, आता मनोरंजनाच्या क्षेत्रात 'लाडकी विहीण योजना' नावाचे नवीन नाटक धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहे. या नाटकाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीची 'कॉमेडी क्वीन' निर्मिती सावंत प्रदीर्घ काळानंतर रंगमंचावर पुनरागमन करत आहेत. एकेकाळी ज्यांच्या नाटकांना 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड लागयचे, त्या निर्मिती सावंत पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. विशेष म्हणजे, 'कुमारी गंगूबाई मॅट्रिक' सारखे सुपरहिट नाटक देणारे दिग्दर्शक राजेश देशपांडे, निर्माते दिलीप जाधव आणि अभिनेत्री निर्मिती सावंत हे 'यशस्वी त्रिकूट' या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आहे. हा एक कौटुंबिक ड्रामा (Family Drama) असून यात विहिणींमधील मजेशीर नातेसंबंधांवर भाष्य करण्यात आले आहे. कोकणच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरेल, यात शंका नाही.



गेल्या काही काळापासून गंभीर भूमिकांमध्ये दिसलेल्या अभिनेत्री निर्मिती सावंत आता पुन्हा एकदा त्यांच्या लाडक्या विनोदी रूपात प्रेक्षकांसमोर येत आहेत. 'लाडकी विहीण योजना' या नव्या नाटकाद्वारे त्यांचा हा जबरदस्त विनोदी अवतार रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे. याबद्दल बोलताना निर्मिती सावंत यांनी व्यक्त केले की, "प्रेक्षकांना आवडणारी विनोदी निर्मिती पुन्हा आणणे आणि ज्या 'अष्टविनायक' संस्थेने मला ओळख दिली, त्यांच्यासोबत पुन्हा काम करणे हा माझ्यासाठी सोन्याहून पिवळा योग आहे." या नाटकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याची निर्मिती केवळ दिलीप जाधवच नाही, तर स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, मंजिरी ओक आणि संजय मेमाणे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी 'पंचशील एंटरटेन्मेंट'च्या माध्यमातून केली आहे. नुकतेच या नाटकाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून, त्यात निर्मिती सावंत 'सेल्फी स्टिक' घेऊन सेल्फी काढताना दिसत आहेत. या हटके पोस्टरने सोशल मीडियावर चाहत्यांची उत्सुकता कमालीची वाढवली असून, राजेश देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली हे कौटुंबिक नाटक मनोरंजनाची मोठी मेजवानी ठरेल, अशी खात्री निर्मात्यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया