आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केलेल्या वीज प्रश्नांची ऊर्जा विभागाकडून गांभीर्याने दखल

वीज समस्यांवर उपाययोजना राबवण्याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश


ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी बोलावली उच्चस्तरीय आढावा बैठक


मालवण : आमदार निलेश राणे यांची विधिमंडळातील दमदार कामगिरी महाराष्ट्र अनुभवत असताना त्यांच्या मागण्यांची दखल विधिमंडळ व मंत्रालय स्तरावर तत्काळ घेतली जात आहे. पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी वीज समस्यांबाबत प्रश्न उपस्थित केले. त्याची गांभीर्याने तत्काळ दखल घेत चालू अधिवेशनातच ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी बैठक बोलावली. त्यांनी या बैठकीत महत्त्वाचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. हे सर्व पाहता मालवण-कुडाळला निश्चितच हक्काचे नेतृत्व मिळाले आहे. जनतेचा आवाज विधिमंडळात पोहोचत आहे. जनतेला न्याय मिळत आहे. अशा भावना जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत.


महाराष्ट्र विधिमंडळच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात कोकणातील विजेच्या गंभीर समस्यांबाबत आमदार निलेश राणे यांनी संपूर्ण आकडेवारीसह अभ्यासपूर्ण मांडणी करताना सभागृहात वीज प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांची ऊर्जा विभागाने गांभीर्याने दखल घेतली. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मंगळवारी कोकण विभागातील ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आयोजित केली होती.


या बैठकीत वीज समस्यांबाबत विविध तांत्रिक अडचणी, खंडित वीजपुरवठा, वितरण व्यवस्था आणि नागरिकांच्या तक्रारी या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. योग्य त्या उपाययोजना राबवण्यासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार महेंद्र दळवी, शेखर निकम, प्रशांत ठाकूर, रवीशेठ पाटील, ऊर्जा विभागाचे सचिव लोकेशचंद्र तसेच ऊर्जा विभागाचे अधिकारी वर्ग
उपस्थित होते.

Comments
Add Comment

MSRTC : कोकणातील स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी; मालवण ते थेट अक्कलकोट नवीन एसटी बससेवा सुरू!

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने कोकणातील स्वामी समर्थ भक्तांसाठी एक अत्यंत

Nitesh Rane : कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पालकमंत्री नितेश राणेंनी घेतला चहा-भजीचा आस्वाद

मसूरे : सत्तेच्या पदांचा किंवा प्रोटोकॉलचा कोणताही अभिनिवेश न बाळगता जनतेत मिसळणे, कार्यकर्त्यांच्या

Nitesh Rane : दोन वेळा शेतकरी कर्जमुक्ती देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री;मंत्री नितेश राणेंचे वक्तव्य

कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यात प्रथमच दोन वेळा

Nitesh Rane : एआयच्या मदतीने कोकणातील शेतकरी सक्षम करणार, मत्स्यव्यावसायिकांनाही शेतकरी योजनांचा लाभ देणार

कणकवली : हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेती आणि शेतकरी अधिक सक्षम करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)

Nitesh Rane : चिपी विमानतळाला जलमार्गांनी जोडणार

मंत्री नितेश राणे यांची घोषणा; १५ ऑगस्टपासून नवी मुंबई-चिपी विमानसेवा सुरू होणार मुंबई : "सिंधुदुर्ग जिल्ह्याचा

NITESH RANE : वैभववाडी नाधवडे येथील प्रस्तावित 'एमआयडीसी' आता पर्यायी जागेवर; पालकमंत्री नितेश राणे

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गामुळे होणार फायदा https://prahaar.in/2026/07/22/western-railway-railone-app-western-railway-urges-passengers-to-use-the-railone-app/ मुंबई : वैभववाडी