धक्कादायक! मुंबईत सावत्र पित्याने चार वर्षाच्या चिमुरडीचा घेतला जीव, कारण ऐकून व्हाल हैराण

मुंबई: मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका सावत्र पित्याने आपल्या चार वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीसोबत वेळ घालवता येत नव्हता म्हणून या सावत्र पित्याने हे कृत्य केले.


या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान या हत्येचा उलगडा झाला. दरम्यान, वरळीवरून आरोपी इमरान शेखला अँटॉप हिल पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही चिमुकली रोज रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असयाची. यामुळे इमरान शेखला आपल्या पत्नीसोबत वेळ घालवता येत नसे. याचा राग त्याच्या मनात खदखदत होता. हाच राग मनात ठेवून आरोपी पित्याने ही क्रूर हत्या केली. तसेच आपला गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून मृतदेह कुलाबा येथील समुद्रात फेकला. मात्र दुसऱ्यादिवशी सकाळी ससून डॉकजवळ चिमुरडीचा मृतदेह सापडताच पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासाच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी आरोपी पित्याची कसून चौकशी केली. या चौकशीतून अखेर सत्य समोर आले. त्यानंतर या सावत्र पित्याला अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या