धक्कादायक! मुंबईत सावत्र पित्याने चार वर्षाच्या चिमुरडीचा घेतला जीव, कारण ऐकून व्हाल हैराण

  67

मुंबई: मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका सावत्र पित्याने आपल्या चार वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीसोबत वेळ घालवता येत नव्हता म्हणून या सावत्र पित्याने हे कृत्य केले.


या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान या हत्येचा उलगडा झाला. दरम्यान, वरळीवरून आरोपी इमरान शेखला अँटॉप हिल पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही चिमुकली रोज रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असयाची. यामुळे इमरान शेखला आपल्या पत्नीसोबत वेळ घालवता येत नसे. याचा राग त्याच्या मनात खदखदत होता. हाच राग मनात ठेवून आरोपी पित्याने ही क्रूर हत्या केली. तसेच आपला गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून मृतदेह कुलाबा येथील समुद्रात फेकला. मात्र दुसऱ्यादिवशी सकाळी ससून डॉकजवळ चिमुरडीचा मृतदेह सापडताच पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासाच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी आरोपी पित्याची कसून चौकशी केली. या चौकशीतून अखेर सत्य समोर आले. त्यानंतर या सावत्र पित्याला अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

बाप्पाच्या स्वागताला वरुणराजाचे आगमन ! या ठिकाणी यलो अलर्ट जारी

मुंबई : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यामुळे हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये पुढील २४

मुंबईत आंदोलन करण्यास मनोज जरांगे पाटील यांना न्यायालयाची मनाई

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे उपोषण करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. मराठा

एसटी कर्मचाऱ्यांचा ऑगस्टचा पगार गणेशोत्सवापूर्वी

मुंबई : राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा

आता मेट्रो-३ रविवारीही सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ ही मेट्रो ३ ची सेवा आता रविवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू होणार आहे. मेट्रो ३

गणेशोत्सवाच्या सुट्टीत खुले राहणार 'जिजामाता उद्यान'

मुंबई: गणेशोत्सवाच्या सुट्टीतही 'जिजामाता उद्यान' बुधवारी पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. मात्र २८ ऑगस्ट या दिवशी

'आपले सरकार' पोर्टलवरील सेवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून द्याव्यात', मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना सेवा पुरवल्या जातात, या सेवांसाठी आपले सरकार हे पोर्टल