धक्कादायक! मुंबईत सावत्र पित्याने चार वर्षाच्या चिमुरडीचा घेतला जीव, कारण ऐकून व्हाल हैराण

मुंबई: मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका सावत्र पित्याने आपल्या चार वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीसोबत वेळ घालवता येत नव्हता म्हणून या सावत्र पित्याने हे कृत्य केले.


या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान या हत्येचा उलगडा झाला. दरम्यान, वरळीवरून आरोपी इमरान शेखला अँटॉप हिल पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही चिमुकली रोज रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असयाची. यामुळे इमरान शेखला आपल्या पत्नीसोबत वेळ घालवता येत नसे. याचा राग त्याच्या मनात खदखदत होता. हाच राग मनात ठेवून आरोपी पित्याने ही क्रूर हत्या केली. तसेच आपला गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून मृतदेह कुलाबा येथील समुद्रात फेकला. मात्र दुसऱ्यादिवशी सकाळी ससून डॉकजवळ चिमुरडीचा मृतदेह सापडताच पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासाच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी आरोपी पित्याची कसून चौकशी केली. या चौकशीतून अखेर सत्य समोर आले. त्यानंतर या सावत्र पित्याला अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात