धक्कादायक! मुंबईत सावत्र पित्याने चार वर्षाच्या चिमुरडीचा घेतला जीव, कारण ऐकून व्हाल हैराण

मुंबई: मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका सावत्र पित्याने आपल्या चार वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीसोबत वेळ घालवता येत नव्हता म्हणून या सावत्र पित्याने हे कृत्य केले.


या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान या हत्येचा उलगडा झाला. दरम्यान, वरळीवरून आरोपी इमरान शेखला अँटॉप हिल पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही चिमुकली रोज रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असयाची. यामुळे इमरान शेखला आपल्या पत्नीसोबत वेळ घालवता येत नसे. याचा राग त्याच्या मनात खदखदत होता. हाच राग मनात ठेवून आरोपी पित्याने ही क्रूर हत्या केली. तसेच आपला गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून मृतदेह कुलाबा येथील समुद्रात फेकला. मात्र दुसऱ्यादिवशी सकाळी ससून डॉकजवळ चिमुरडीचा मृतदेह सापडताच पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासाच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी आरोपी पित्याची कसून चौकशी केली. या चौकशीतून अखेर सत्य समोर आले. त्यानंतर या सावत्र पित्याला अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.