Yogesh Kadam : पासपोर्टसाठी निवासी पत्ता व्हेरिफिकेशन प्रक्रिया केंद्र शासनाच्या SOP नुसारच होणार – गृहराज्यमंत्री योगेश कदम

  54

मुंबई : पासपोर्ट अर्जदारांची निवासी पत्त्याबाबतची व्हेरिफिकेशन प्रक्रिया ही राज्याच्या गृह विभागाकडून केंद्र शासनाच्या ठरवलेल्या मानक कार्यपद्धती (SOP) नुसारच केली जाते, असे गृह विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


पासपोर्ट अधिनियम (Passport Act) हा केंद्र सरकारचा कायदा असून, याअंतर्गत निवासी पत्ता पडताळणी बरोबरच अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी, नागरिकत्व आणि अन्य आवश्यक बाबींची तपासणी केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने ती अत्यंत काटेकोर आणि नियमबद्ध पद्धतीने केली जाते.



पासपोर्ट अर्ज करताना अर्जदाराने जर स्थलांतर केले असेल, तर अर्जात स्थायी (Permanent Address) आणि सध्याचा पत्ता (Current Address) अशी दोन्ही माहिती देणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत भाडेकरुच्या निवासी भाडे करारनाम्य मध्ये नमूद पत्त्याचाही स्वीकार केला जातो, परंतु त्याची पडताळणी व्हेरिफिकेशन दरम्यान केली जाते. संबंधित एसओपी आणि कायद्याच्या अधीन राहूनच पोलीस प्रशासन आपले कर्तव्य बजावत असते. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती माहिती अर्जात नमूद करावी आणि आवश्यक मूळ कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन गृह विभागाने केले आहे.

Comments
Add Comment

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत

Mumbai Building Collapse: मदनपुरात चार मजली इमारत कोसळली, परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या गजबलेल्या परिसरात येत असलेली एक जुनी इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मदनपुरा

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी