Yogesh Kadam : पासपोर्टसाठी निवासी पत्ता व्हेरिफिकेशन प्रक्रिया केंद्र शासनाच्या SOP नुसारच होणार – गृहराज्यमंत्री योगेश कदम

  66

मुंबई : पासपोर्ट अर्जदारांची निवासी पत्त्याबाबतची व्हेरिफिकेशन प्रक्रिया ही राज्याच्या गृह विभागाकडून केंद्र शासनाच्या ठरवलेल्या मानक कार्यपद्धती (SOP) नुसारच केली जाते, असे गृह विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


पासपोर्ट अधिनियम (Passport Act) हा केंद्र सरकारचा कायदा असून, याअंतर्गत निवासी पत्ता पडताळणी बरोबरच अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी, नागरिकत्व आणि अन्य आवश्यक बाबींची तपासणी केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने ती अत्यंत काटेकोर आणि नियमबद्ध पद्धतीने केली जाते.



पासपोर्ट अर्ज करताना अर्जदाराने जर स्थलांतर केले असेल, तर अर्जात स्थायी (Permanent Address) आणि सध्याचा पत्ता (Current Address) अशी दोन्ही माहिती देणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत भाडेकरुच्या निवासी भाडे करारनाम्य मध्ये नमूद पत्त्याचाही स्वीकार केला जातो, परंतु त्याची पडताळणी व्हेरिफिकेशन दरम्यान केली जाते. संबंधित एसओपी आणि कायद्याच्या अधीन राहूनच पोलीस प्रशासन आपले कर्तव्य बजावत असते. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती माहिती अर्जात नमूद करावी आणि आवश्यक मूळ कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन गृह विभागाने केले आहे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही