Yogesh Kadam : पासपोर्टसाठी निवासी पत्ता व्हेरिफिकेशन प्रक्रिया केंद्र शासनाच्या SOP नुसारच होणार – गृहराज्यमंत्री योगेश कदम

मुंबई : पासपोर्ट अर्जदारांची निवासी पत्त्याबाबतची व्हेरिफिकेशन प्रक्रिया ही राज्याच्या गृह विभागाकडून केंद्र शासनाच्या ठरवलेल्या मानक कार्यपद्धती (SOP) नुसारच केली जाते, असे गृह विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


पासपोर्ट अधिनियम (Passport Act) हा केंद्र सरकारचा कायदा असून, याअंतर्गत निवासी पत्ता पडताळणी बरोबरच अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी, नागरिकत्व आणि अन्य आवश्यक बाबींची तपासणी केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने ती अत्यंत काटेकोर आणि नियमबद्ध पद्धतीने केली जाते.



पासपोर्ट अर्ज करताना अर्जदाराने जर स्थलांतर केले असेल, तर अर्जात स्थायी (Permanent Address) आणि सध्याचा पत्ता (Current Address) अशी दोन्ही माहिती देणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत भाडेकरुच्या निवासी भाडे करारनाम्य मध्ये नमूद पत्त्याचाही स्वीकार केला जातो, परंतु त्याची पडताळणी व्हेरिफिकेशन दरम्यान केली जाते. संबंधित एसओपी आणि कायद्याच्या अधीन राहूनच पोलीस प्रशासन आपले कर्तव्य बजावत असते. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती माहिती अर्जात नमूद करावी आणि आवश्यक मूळ कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन गृह विभागाने केले आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल