मॉर्निंग वॉक किंवा व्यायामानंतर पाणी पिताना 'ही' घ्या काळजी, अन्यथा...

अनेक लोकांना याची माहिती नसते की मॉर्निंग वॉक किंवा कोणताही व्यायाम केल्यानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी कितपत योग्य आहे. बऱ्याचदा घाम आल्याने आणि शरीराचे तापमान वाढल्याने लगेच तहान लागते आणि लोक कोणताही विचार न करता घटाघट पाणी पितात. पण, तज्ज्ञांच्या मते, व्यायाम केल्यानंतर लगेच पाणी पिणे हानिकारक ठरू शकते.


व्यायामानंतर लगेच पाणी का पिऊ नये?


जेव्हा आपण चालतो किंवा कोणताही व्यायाम करतो, तेव्हा आपल्या शरीराचे तापमान वाढते आणि घाम येऊ लागतो. या काळात रक्ताभिसरण वाढते आणि शरीराला सामान्य तापमानावर येण्यासाठी थोडा वेळ लागतो. अशा स्थितीत लगेच पाणी प्यायल्यास खालील अडचणी येऊ शकतात.


सर्दी किंवा खोकला: वाढलेल्या शरीराच्या तापमानात अचानक थंड पाणी प्यायल्याने शरीर एकदम थंड होऊन सर्दी किंवा खोकला होऊ शकतो.


पोटात दुखणे: प्रचंड तहान लागलेली असताना अचानक जास्त पाणी प्यायल्यास पोटात दुखू शकते किंवा चमक मारू शकते.


पचनावर परिणाम: लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावू शकते, ज्यामुळे अपचन होऊ शकते.


वॉक किंवा व्यायामानंतर किती वेळाने पाणी प्यावे?


तज्ज्ञांच्या माहितीनुसार, चालणे थांबवल्यानंतर किमान २० ते ३० मिनिटांनी पाणी प्यावे. या काळात तुम्ही काही वेळ बसून हलके स्ट्रेचिंग करून शरीराला 'कूल डाऊन' करू शकता. जेव्हा तुमच्या हृदयाचे ठोके (पल्स रेट) सामान्य होतील आणि घाम येणे बंद होईल, तेव्हा पाणी पिणे योग्य राहील.


या टिप्स फॉलो करा:


हळूहळू प्या: एकाच वेळी जास्त पाणी पिण्याऐवजी हळू हळू एक-एक घोट पाणी प्या.


रूम टेंपरेचरचे पाणी: थंड पाणी पिण्याऐवजी हलके कोमट पाणी पिणे नेहमीच चांगले.


हायड्रेटेड रहा: केवळ चालतानाच नव्हे, तर संपूर्ण दिवसभर योग्य प्रमाणात पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवा. खूप घाम येत असेल, तर साध्या पाण्याऐवजी नारळ पाणी किंवा लिंबू पाणी पिऊ शकता.


योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पाणी प्यायल्याने शरीर लवकर रिकव्हर होण्यास मदत होते आणि त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात. त्यामुळे यापुढे वॉक किंवा व्यायाम करताना तहान लागल्यास थोडे थांबा, रिलॅक्स व्हा आणि मग सावकाश पाणी प्या.



(टीप : वरील सर्व बाबी प्रहार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. ही माहिती केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहे. हा वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. या लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी प्रहार घेत नाही आणि कोणताही दावा करत नाही.)

Comments
Add Comment

मूकपणे जीव घेणारा मुख कर्करोग

भारतात तोंडाचा कर्करोग म्हणजे मुख कर्करोग हा दुर्मीळ आजार नाही, कारण देशातील कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी

T.V मुळे तुमचाही विज बिल येतंय जास्त; मग जाणुन घ्या या गोष्टी

आजच्या स्मार्ट होममध्ये टीव्ही हा सर्वाधिक वापरला जाणारा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ठरला आहे. दिवसातील अनेक तास आपण

गंभीर आजार टाळण्यासाटी, वर्षातून एकदा करा ‘या’ चाचण्या

TOP BLOOD TESTS TO DO EVERY YEAR : गंभीर आजार वेळेवर ओळखता यावेत आणि ते टाळता यावेत यासाठी वर्षातून एकदा नियमित आरोग्य तपासणी (हेल्थ

वसंत पंचमी २०२६ : ज्ञान, कला आणि नव्या सुरुवातीचा शुभ दिवस; जाणून घ्या सरस्वती पूजनाची परंपरा आणि महत्त्व

मुंबई : माघ महिन्यातील शुक्ल पंचमीला साजरी होणारी वसंत पंचमी हा हिंदू धर्मातील विशेष मानाचा दिवस मानला जातो.

पोळी-भात सोडता आता वजन करता येणार कमी! जाणून घ्या...

मुंबई : वजन कमी करायचं म्हटलं की सर्वात आधी भात, पोळी आणि बटाट्यांना रामराम ठोकावा लागतो, असा समज आजही अनेकांच्या

Instagram रील्स आता मराठीसह पाच भारतीय भाषांमध्ये उपलब्ध, क्रिएटर्ससाठी खुशखबर..!

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने भारतीय क्रिएटर्ससाठी मोठा अपडेट दिला आहे. आता रील्स तयार करताना क्रिएटर्सना