परेल टी.टी. पुलावरील वाहतूक आता होणार सुरळीत

आता डांबराऐवजी सिमेंट काँक्रीटचा वापर


मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील मडकेबुवा चौकातून जाणारा अर्थात परेल टी टीचा पूल म्हणून प्रसिध्द असलेल्या संत शिरोमणी नामदेव महाराज उड्डाणपूलाची आता डागडुजी केली जाणार आहे. तसेच या पुलावर वारंवार खड्डे पडत असल्याने या पुलाचा पृष्ठभाग आता सिमेंट काँक्रिटचा केला जाणार आहे. या पुलावरील खड्डयांची समस्या कायमच निकालात निघाली जाण्याची शक्यता आहे.


परेलच्या पूर्व बाजुस असलेल्या "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील मडकेबुवा चौकातून जाणारा परेल टी.टी. म्हणजेच संत शिरोमणी श्री. नामदेव महाराज उड्डाणपुल हे सन १९८९ मध्ये बांधण्यात आले. या पुलाची उभारणी तत्कालिन तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आली. परंतु या पुलाचे बांधकाम करताना रचना केलेले प्रसरण साधे आणि त्याच्या पृष्ठभागातील डांबराचा वापर केला जात असल्याने पावसाळ्यात खड्डे पडण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. त्यामुळे या पुलाच्या डागडुजीचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येणार आहे.


महापालिका पूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, परेल टी टी पुलाच्या बांधकामामध्ये एकूण २२ प्रसरण सांधे आहेत. पुलाच्या पृष्ठभागावरील रस्त्याची वारंवार दुरुस्ती करावी लागत आहे. तसेच, जास्त प्रसरण सांधे हे वाहतुकीसाठी गैरसोईचे आहेत.


यावर उपाय म्हणून डेक कन्टीन्युटी ३ ते ४ प्रांतर आणि पुलावरील पष्ठभागावर १०० मि.मी.चा प्रचलित कॉक्रीटचा थर देण्यात येणार आहे. जेणेकरुन रायडींग क्वॉलिटी मिळू शकेल. याच प्रमाणे या पुलाचे बेअरिंग बदलणे आवश्यक आहेत. तसेच या काम करतांना पुलाचे गर्डर व पिअर यांना सीएफआरपीद्वारे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने या पुलाची सुधारणा तथा दुरुस्ती करण्यात येणार आहे.


यासाठी महापालिकेच्यावतीने निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये गुजरातमधील रिबिल्ड स्ट्रक्ट असोसिएटस ही कंपनी पात्र ठरली आहे. या गुजरामधील कंपनीला हे काम देण्यात आले असून यासाठी विविध करांसह १७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे या कंपनीचे स्वतः च्या मालकीचे साहित्य आणि यंत्रे आहेत तसेच सद्यस्थितीत त्यांच्याकडे कमी कामे असल्याने त्यांचे बरेच कामगार कामाशिवाय आहेत म्हणून ते कमी दरामध्ये काम करण्यास उत्सुक आहेत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात