लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे. पण सध्या लाभार्थी महिलांना या ई-केवायसी पोर्टलवर ओटीपी मिळण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याचे समोर आले. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करून या अडचणींची नोंद घेतली असून ई-केवायसी प्रक्रियेत येणाऱ्या ओटीपीसंबंधीच्या या तांत्रिक अडचणी लवकरच दूर केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.


तटकरे म्हणाल्या, ई-केवायसी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीवर तज्ज्ञांच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही अडचण दूर होऊन ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते.


ई-केवायसी प्रक्रियेत केवळ लाभार्थी महिलेचीच नव्हे, तर तिच्यासोबत पती किंवा वडिलांची ई-केवायसी करणेही अनिवार्य आहे. याचा उद्देश हा आहे की, लाभार्थी महिलेचे वार्षिक उत्पन्न तसेच तिच्या पतीचे किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न शोधले जाईल. जर महिलेचे लग्न झाले असेल तर तिच्या पतीचे आणि लग्न झाले नसेल तर वडिलांचे उत्पन्न तपासले जाणार आहे.



अपात्रतेचे नियम


लाभार्थी महिलेचे स्वतःचे उत्पन्न आणि त्यासोबतच तिच्या पतीचे किंवा वडिलांचे उत्पन्न मिळून ते अडीच लाखांपेक्षा जास्त आढळल्यास ती महिला अपात्र ठरवली जाईल. याशिवाय महिलेच्या पती किंवा वडिलांच्या नावे चारचाकी वाहन असल्यास त्या महिलेला अपात्र ठरवण्यात येत आहे. शिवाय एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिला या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यापैकी एका महिलेला अपात्र ठरवण्यात येत आहे. या योजनेसाठी महिलेचे वय २१ ते ६५ च्या दरम्यान असणे बंधनकारक आहे. या गटात न मोडणाऱ्या महिलांनाही ई-केवायसीच्या माध्यमातून अपात्र करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Medical Store Close At 20 May : महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद; कारण वाचा...

येत्या २० मे २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या आणि रुग्णांच्या चिंतेत भर टाकणारी एक मोठी घडामोड समोर

Rat poison found in watermelon : पायधुनी कलिंगड मृत्यू प्रकरण : उंदीर मारणाऱ्या 'झिंक फॉस्फाईड'वर जगात कोणताही उतारा का नाही? वाचा सविस्तर

मुंबई : मुंबईतील पायधुनी (Mumbai Paydhuni) परिसरात २६ एप्रिलच्या पहाटे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. सुरुवातीला

Mumbai paydhuni four death watermelon : कलिंगड नव्हे, तर 'या' कारणामुळे गेला डोकाडिया कुटुंबाचा जीव; मृत्यूचं गूढ अखेर उकललं!

मुंबई : मुंबईतील पायधुनी(Mumbai Paydhuni Watermelon Case) परिसरात डोकाडिया कुटुंबावर (Dikadia Family)ओढवलेल्या दुर्दैवी प्रसंगामुळे संपूर्ण

Marijuana Cultivation : भांडुप जलाशय टेकडीवर गांजाची शेती, भाजप नगरसेविकेने आणली निदर्शनास

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप जलाशय टेकडी येथील डोंगराळ भागात काही समाजकंटकांनी बेकायदेशीररित्या गांजाची

BMC Staff : महानगरपालिका कर्मचारीच स्व-गणना सदिच्छादूत

मेट्रो, रेल्वे, बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणी स्व-गणना संदर्भात जनजागृती  मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आतापर्यंत

Water Cut : ग्रॅण्टरोड, गिरगांव भायखळा, महालक्ष्मी,वरळी आदी काही भागांमध्ये शुक्रवारीही पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डॉ. ई. मोझेस मार्गावरील फेमस स्टुडिओसमोर असलेल्या १६५० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य