'मुलगा सुखरूप पृथ्वीवर परतला, आता काही भीती नाही!" शुभांशू शुक्लाच्या आईवडिलांनी दिली भावनिक प्रतिक्रिया, पंतप्रधानांनीही केले अभिनंदन

  79

नवी दिल्ली: अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेतून यशस्वीरित्या परतल्यानंतर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लाच्या कुटुंबामध्ये आनंदाची लाट पसरली आहे. "मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण होऊन मुलगा सुखरूप परतला, आता कोणतीही भीती नाही" असे भावोद्गार शुभांशु शुक्ला यांच्या आईने काढले. तर त्यांच्या वडिलांनीदेखील आनंद व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदींनी देखील शुभांशु शुक्ला यांचे अभिनंदन करत त्यांना अब्जावधी स्वप्नांचा प्रेरणास्थान म्हटले.


१८ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहिल्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज मंगळवारी पृथ्वीवर सुरक्षितपणे परतले. त्यांच्या या ऐतिहासिक मोहिमेनंतर संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. या खास प्रसंगी शुभांशूची आई आशा शुक्ला यांनी आनंदाश्रूसोबत आपला आनंद व्यक्त केला.


"मुलगा खूप मोठे मिशन पूर्ण करून परतला आहे. तो कसा गेला आणि कसा परत आला हे पाहणेच खूप मोठी गोष्ट होती. मी सतत देवाला प्रार्थना करत होती की लँडिंग सुरक्षित व्हावे. आता सर्व भीती संपली आहे आणि मी पूर्णपणे निश्चिंत झाले आहे" अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या,


शुभांशूचे वडील शंभू दयाळ शुक्ला यांनीही आनंद व्यक्त करताना सांगितले की "या मोहिमेसाठी आमच्या मुलाला प्रोत्साहन आणि भरभरून आशीर्वाद देणाऱ्या सर्वांचे आम्ही आभार मानतो." शुभांशूच्या कुटुंबाने केक कापत त्यांच्या परतीचा आनंद साजरा केला.



पंतप्रधान मोदींनी केले शुभांशू शुक्ला यांचे अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या खास प्रसंगी अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे अभिनंदन केले. "आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे भारताचे पहिले अंतराळवीर म्हणून शुभांशू शुक्ला यांनी धैर्य आणि समर्पण भावनेने अब्जावधी स्वप्नांना प्रेरणा दिली आहे. आपल्या स्वतःच्या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेच्या दिशेने हा आणखी एक मैलाचा दगड आहे - गगनयान, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर एक पोस्ट करत शुभांशूचे स्वागत केले.

Comments
Add Comment

नेपाळ, भूतानमधील नागरिकांना व्हिसा-पासपोर्टची गरज नाही!

नवी दिल्ली : नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करताना पासपोर्ट किंवा

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

उज्जैन : बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

भारतासोबत सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यास जग तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जगाची शक्ती सेमीकंडक्टर चिप्समध्ये एकवटली;पूर्वी तेलाच्या विहिरीद्वारे भविष्य ठरायचे, एक दिवस जग

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी