Mumbai Rain: मुंबईत पावसाचा हाहाकार: अंधेरीत गाड्या पाण्याखाली, लोकल-विमानसेवा विस्कळीत!

मुंबई: गेल्या काही तासांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर प्रचंड वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी दहा वाजल्यापासून उपनगरांमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले आहे, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे.



अंधेरी सबवे पाण्याखाली, रेल्वे-विमान वाहतुकीला फटका!


पश्चिम उपनगरात मागील दीड ते दोन तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी साचल्याने वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आला आहे. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून वाहतूक थांबवली आहे. काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.


मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत, ज्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.


त्याचबरोबर, मुंबईतील हवाई वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. मुंबई विमानतळावर विमानांचे उड्डाण आणि लँडिंगमध्ये अडथळे येत असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे अनेक विमानांना विलंब होत आहे.



रत्नागिरीत संततधार, कशेडी घाटात दरड कोसळली!


दुसरीकडे, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. लांजा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, काजळी नदीची पाणीपातळी वाढल्याने अंजणारी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे. रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे दत्त मंदिर परिसरात तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले आहे.


गेल्या दोन दिवसांपासून कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कशेडी घाटालाही बसला आहे. कशेडी घाटातील बोगद्याजवळ दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी, मुसळधार पावसामुळे प्रशासनाला अडचणी येत आहेत.


पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मुंबई आणि कोकणात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतुकीची अद्ययावत माहिती घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

Water hyacinth : पवई तलावातील जलपर्णी आता कायमची हद्दपार..

तलावाच्या विहार पथाचा विकास सी एस आर निधीतून.. मुंबई: मुंबई महापालिकेच्या पवई तलावात सांडपाण्याच्या

Devendra Fadnavis : बी.टी. सरांच्या निधनाने वैयक्तिक मार्गदर्शकाला मुकलो!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना मुंबई, माजी आमदार, शिक्षणतज्ञ आणि विविध सामाजिक प्रश्नांचे गाढे

Devendra Fadnavis : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद

'चेहरा पडताळणी पद्धती'द्वारेच प्रवेश; मुख्यमंत्र्यांपासून मंत्री आणि पीठासीन अधिकाऱ्यांसह सर्व घटकांसाठी

Shrikant Shinde : दोन दिवस वाट पहा, सगळं स्पष्ट होईल!

 'ऑपरेशन टायगर'वर खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर

Pratap Sarnaik : बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबई, : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत

Minister Dadaji Bhuse : शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार

राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभ मुंबई : राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल