बांगलादेशातून पंतप्रधान मोदींना ‘हरिभंगा’ची भेट

नवी दिल्ली : बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्राध्यापक मुहम्मद युनूस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंबे पाठवले आहेत. बांगलादेशकडून दरवर्षी आंबे पाठवले जातात, पण यावेळी दोन्ही देशांमधील संबंध तणावाचे असल्याने या आंब्यांना खास महत्त्व आले आहे. ऑगस्टमध्ये शेख हसीना पंतप्रधान पदावरून गेल्यानंतर नवी दिल्ली आणि ढाका यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.


बांगलादेशमधील हंगामी सरकार भारतासोबतचे संबंध मधूर करण्यास इच्छुक आहे. याचे संकेत म्हणून युनूस यांनी पंतप्रधान मोदींना १ हजार किलो ‘हरिभंगा’ आंबे पाठवले आहेत. विशेष म्हणजे, माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ही ‘आंबा कूटनीति’ सुरू केली होती. जी बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या एका वर्षात भारत-बांगलादेश संबंधांमध्ये अनेक चढ-उतार आले आहेत. अशा परिस्थितीत, बांगलादेशच्या या पावलाकडे भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी एक नवा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

Comments
Add Comment

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ

जर्मनीच्या कैदेत असलेल्या अरिहासाठी आईने ओलांडली भाषेची भिंत

लेकीला परत आणण्यासाठी आई-वडिलांचा ४० महिन्यांपासून लढा नवी दिल्ली : आपल्या काळजाच्या तुकड्याला, पाच वर्षांच्या

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर

'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच

लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा पाकला इशारा नवी दिल्ली : "भारतीय लष्कर सीमेवर अत्यंत सतर्क असून शत्रूच्या

कुत्रा चावल्यास मोबदला राज्य सरकारने द्यावा!

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : कुत्र्यांनी घेतलेला चावा किंवा हल्ल्यामुळे जर कुणी जखमी झाला किंवा