बांगलादेशातून पंतप्रधान मोदींना ‘हरिभंगा’ची भेट

नवी दिल्ली : बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्राध्यापक मुहम्मद युनूस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंबे पाठवले आहेत. बांगलादेशकडून दरवर्षी आंबे पाठवले जातात, पण यावेळी दोन्ही देशांमधील संबंध तणावाचे असल्याने या आंब्यांना खास महत्त्व आले आहे. ऑगस्टमध्ये शेख हसीना पंतप्रधान पदावरून गेल्यानंतर नवी दिल्ली आणि ढाका यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.


बांगलादेशमधील हंगामी सरकार भारतासोबतचे संबंध मधूर करण्यास इच्छुक आहे. याचे संकेत म्हणून युनूस यांनी पंतप्रधान मोदींना १ हजार किलो ‘हरिभंगा’ आंबे पाठवले आहेत. विशेष म्हणजे, माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ही ‘आंबा कूटनीति’ सुरू केली होती. जी बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या एका वर्षात भारत-बांगलादेश संबंधांमध्ये अनेक चढ-उतार आले आहेत. अशा परिस्थितीत, बांगलादेशच्या या पावलाकडे भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी एक नवा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

Comments
Add Comment

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी

करूर चेंगराचेंगरी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा १३ ऑक्टोबरला निर्णय

चेन्नई : करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर १३ ऑक्टोबर रोजी

सर्वसामान्यांसाठी नवा परवडणारा 5G स्मार्टफोन, सॅमसंग गॅलेक्सी M17 5G

सॅमसंग गॅलेक्सी M17 5G फक्त ₹12,499 पासून, दमदार फीचर्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स  मुंबई : सॅमसंगने भारतात आपला

अतिरेक्यांना पकडण्याची ती पद्धत चुकली, चिदंबरम यांचे धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली : अतिरेकी भिंद्रनवाला आणि समर्थक शस्त्रसाठा घेऊन शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात लपले होते. या

Diwali 2025 : Elite Marque कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली सलग ९ दिवसांची सुट्टी !

दिवाळीत ईमेल बंद ठेवा, मिठाई खा आणि निवांत झोपा – सीईओ रजत ग्रोवर यांचा सल्ला नवी दिल्ली : दिवाळीच्या सणाला बहुतेक

भारत - बांगलादेश सीमेवर बीएसएफची मोठी कारवाई, २० किलो सोनं जप्त !

नवी दिल्ली : भारत - बांगलादेश सीमेलगत वाढत्या तस्करीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल (BSF) तैनात