बांगलादेशातून पंतप्रधान मोदींना ‘हरिभंगा’ची भेट

नवी दिल्ली : बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्राध्यापक मुहम्मद युनूस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंबे पाठवले आहेत. बांगलादेशकडून दरवर्षी आंबे पाठवले जातात, पण यावेळी दोन्ही देशांमधील संबंध तणावाचे असल्याने या आंब्यांना खास महत्त्व आले आहे. ऑगस्टमध्ये शेख हसीना पंतप्रधान पदावरून गेल्यानंतर नवी दिल्ली आणि ढाका यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.


बांगलादेशमधील हंगामी सरकार भारतासोबतचे संबंध मधूर करण्यास इच्छुक आहे. याचे संकेत म्हणून युनूस यांनी पंतप्रधान मोदींना १ हजार किलो ‘हरिभंगा’ आंबे पाठवले आहेत. विशेष म्हणजे, माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ही ‘आंबा कूटनीति’ सुरू केली होती. जी बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या एका वर्षात भारत-बांगलादेश संबंधांमध्ये अनेक चढ-उतार आले आहेत. अशा परिस्थितीत, बांगलादेशच्या या पावलाकडे भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी एक नवा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

Comments
Add Comment

Barmati Couple Car Accident Tirupati : तिरुपती दर्शनाहून परतणाऱ्यांवर दु:खाचा डोंगर! बारामतीमधील दांपत्याच्या कारला ट्रक धडकला अन्...

बारामती : गेल्या काही दिवसांत देवदर्शनासाठी निघालेल्या किंवा परतणाऱ्या भाविकांच्या अपघाताच्या दुर्दैवी घटना

महाराष्ट्राचे सुपुत्र वेदमूर्ती देवव्रत रेखेंना 'दण्डक्रम विक्रमादित्य' ही मानाच्या पदवी पात्र! पंतप्रधानांनी केले कौतुक

वाराणसी: अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र देवव्रत महेश रेखे यांनी २०० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. दोन

Woman Injured : पाणीपुरीमुळे जबडा अडकला अन् थेट निखळला; डॉक्टरांनाही करावी लागली शस्त्रक्रिया, 'ही' बातमी वाचून तुम्हीही थबकाल!

दिबियापूर : पाणीपुरी हे सर्वांचेच आवडते खाद्य आहे, विशेषतः महिलांसाठी तो एक 'विक पॉईंट' असतो. पाणीपुरीच्या गाडीवर

म्यानमारमधून भारतात येणाऱ्या ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश! घनदाट जंगलाचा रस्ता, नदीतून बोटीचा प्रवास कशी केली कारवाई? जाणून घ्या सविस्तर

गुवाहाटी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या गुवाहाटी झोनल युनिटने एका समन्वित कारवाईत म्यानमारमधून भारतात

विशेष कारणासाठी पुतिन देणार भारताला भेट! असे असेल पुतिन यांचे वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली