लायसन्स विचारले म्हणून बापलेकाची वाहतूक पोलिसाला मारहाण


नालासोपारा : लायसन्स विचारले म्हणून बापलेकाने वाहतूक पोलिसाला मारहाण केली. ही धक्कादायक घटना नालासोपारा येथे घडली.


नालासोपारा पूर्वेकडील नागीनदास पाडा परिसरात सीतारा बेकारीच्या समोर हनुमंत सांगळे आणि शेषनारायण आठरे हे दोन वाहतूक पोलीस रस्त्यावरुन येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनांनाच्या चालकांना थांबवून वाहनांशी संबंधित कागदपत्रे, लायसन्स याची तपासणी करत होते. तपासणी करणाऱ्या पोलिसांनी एका दुचाकीस्वार मुलाला पोलिसांनी अडवले. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स व गाडीच्या कागदपत्रांची चौकशी केली. चौकशी दरम्यान मुलगा विना लायसन्स गाडी चालवत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.


ड्रायव्हिंग लायसन्स आणि कागदपत्रं विचारल्यामुळे मुलगा चिडला. त्याने वडिलांना बोलावले. मुलगा आणि त्याच्या वडिलांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेला. बापलेकाने वाहतूक पोलिसांना मारहाण सुरू केली. दिवसाढवळ्या भर रस्त्यात रस्त्यात हा प्रकार सुरू होता. काही नागरिकांनी हस्तक्षेप करुन मारहाणीचा प्रकार थांबवला. या घटनेचा उपस्थित असलेल्यांपैकी काहींनी मोबाईलमध्ये व्हिडीओ तयार करुन व्हायरल केला. आता तुळींज पोलीस ठाण्यात वाहतूक पोलिसांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील पोलीस तपास सुरू आहे.




Comments
Add Comment

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वाहतूक सुरू, पहिल्या विमानाचं जोरदार स्वागत

पनवेल : रायगड जिल्ह्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून (गुरुवार २५ डिसेंबर २०२५)

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

आपली पोरं सांभाळू शकले नाहीत, ते मुंबई काय सांभाळणार?

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली

एकनाथ शिंदे - गणेश नाईक यांच्यात मनोमिलन?

मंत्रालयात बंद दाराआड चर्चा; नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तिढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या