लायसन्स विचारले म्हणून बापलेकाची वाहतूक पोलिसाला मारहाण


नालासोपारा : लायसन्स विचारले म्हणून बापलेकाने वाहतूक पोलिसाला मारहाण केली. ही धक्कादायक घटना नालासोपारा येथे घडली.


नालासोपारा पूर्वेकडील नागीनदास पाडा परिसरात सीतारा बेकारीच्या समोर हनुमंत सांगळे आणि शेषनारायण आठरे हे दोन वाहतूक पोलीस रस्त्यावरुन येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनांनाच्या चालकांना थांबवून वाहनांशी संबंधित कागदपत्रे, लायसन्स याची तपासणी करत होते. तपासणी करणाऱ्या पोलिसांनी एका दुचाकीस्वार मुलाला पोलिसांनी अडवले. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स व गाडीच्या कागदपत्रांची चौकशी केली. चौकशी दरम्यान मुलगा विना लायसन्स गाडी चालवत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.


ड्रायव्हिंग लायसन्स आणि कागदपत्रं विचारल्यामुळे मुलगा चिडला. त्याने वडिलांना बोलावले. मुलगा आणि त्याच्या वडिलांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेला. बापलेकाने वाहतूक पोलिसांना मारहाण सुरू केली. दिवसाढवळ्या भर रस्त्यात रस्त्यात हा प्रकार सुरू होता. काही नागरिकांनी हस्तक्षेप करुन मारहाणीचा प्रकार थांबवला. या घटनेचा उपस्थित असलेल्यांपैकी काहींनी मोबाईलमध्ये व्हिडीओ तयार करुन व्हायरल केला. आता तुळींज पोलीस ठाण्यात वाहतूक पोलिसांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील पोलीस तपास सुरू आहे.




Comments
Add Comment

अरुण गवळी तुरुंगातून बाहेर, आता लेक योगिता गवळी राजकारणात सक्रिय!

मुंबई: अनेक वर्षांनी तुरुंगातून बाहेर आलेले माजी आमदार अरुण गवळी यांनी आता राजकारणात सक्रिय होणार नसल्याचे

Muhurat Trading 2025 : यंदा 'मुहूर्त ट्रेडिंग'च्या वेळेत बदल; दुपारीच होणार खरेदी-विक्री!

मुंबई: दिवाळी निमित्त भारतीय शेअर बाजारातील सर्वात महत्त्वाच्या 'मुहूर्त ट्रेडिंग' सत्राचा यंदाचा वेळ बदलण्यात

मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरिता खुले होणार

मेट्रो मार्ग-४ व ४-अ, टप्पा-१, गायमुख ते विजय गार्डन स्टेशनपर्यंत मेट्रोची तांत्रिक तपासणी व चाचणी संपन्न ठाणे :

अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर सर्वोच्च न्यायालय नाराज

नवी दिल्ली : अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया ड्रीमलाइनर AI-171 विमानाचा १२ जून २०२५ रोजी भीषण अपघात झाला

महालक्ष्मी मंदिरात नवरात्री उत्सवासाठी भाविकांची गर्दी

कोल्हापूर: ११ दिवसांचा नवरात्रोत्सव आज 'करवीर निवासिनी' अंबाबाई, श्री महालक्ष्मी मंदिरात 'घटस्थापना'सह उत्साहात

GST 2.0 सुधारणा लागू केल्यानंतर पंतप्रधान मोदींचे देशाला पत्र

नवी दिल्ली : भारतात GST 2.0 सुधारणा सोमवार २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू झाल्या आहेत. घटस्थापनेच्या दिवशी सुधारणा लागू