Yogesh Kadam : ठेवीदारांचे हित सर्वात महत्त्वाचे! आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराने ‘मैत्रेय ग्रुप’ प्रकरणात ठोस पावले



मुंबई : महाराष्ट्रातील हजारो ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मैत्रेय प्लॉट्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर्स प्रा. लि. आणि मैत्रेय सुपरस्ट्रक्चर्स प्रा. लि. या कंपन्यांविरोधात शासन निर्णायक आणि ठोस कारवाई करत आहे. मागील महिन्यात मंत्रालयात गृहराज्यमंत्री मा. योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली होती.



५६ आरोपींविरोधात कारवाई सुरू


आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात या प्रकरणावर चर्चा झाली असून, गृहराज्यमंत्री मा. योगेश कदम यांनी सविस्तर उत्तर देताना या प्रकरणातील प्रगती व शासनाच्या पुढील कारवाईबाबत माहिती दिली. मैत्रेय ग्रुप प्रकरणात २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदारांची सुमारे २५०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. आत्तापर्यंत ३१ गुन्हे नोंदवले गेले असून ५६ आरोपींविरोधात कारवाई सुरू आहे. ४०९ प्रॉपर्टी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३६० मालमत्तांच्या मूल्यांकनासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. आतापर्यंत ७० प्रॉपर्टींचे मूल्यांकन पूर्ण झाले असून त्याची एकूण किंमत सुमारे २५० कोटी रुपये इतकी आहे.


कोर्टाच्या आदेशानुसार संपूर्ण लिलाव प्रक्रिया पूर्ण करून पुढील ८ ते ९ महिन्यांत गुंतवणूकदारांना पैसे देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनामार्फत इतर राज्यांतील मालमत्तांसंदर्भात पत्रव्यवहारही सुरू असून सुमारे १००० पेक्षा अधिक प्रॉपर्टींची माहिती गोळा करण्यात येत आहे.


गृह राज्यमंत्री मा. योगेश कदम यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की, “ठेवीदारांचे हित हेच शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देणे हीच शासनाची भूमिका आहे.

Comments
Add Comment

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय