'देवमाणूस' मालिकेत नेमकं चाललंय तरी काय?

लालीचं स्वप्न पूर्ण होणार; गोपाळशी बांधली जाणार लग्नगाठ!


मुंबई : झी मराठीवरील थरारक मालिका 'देवमाणूस- मधला अध्याय' प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे. दर आठवड्यला मालिकेत काही ना काही रोमांचक गोष्टी घडत आहेत. प्रेम, स्वार्थ, गुन्हा आणि कौटुंबिक संघर्ष यांचा अफलातून संगम असलेली ही मालिका रोजच्या भागांमधून उलगडत जाणारी रहस्यं, उत्कंठावर्धक वळणं आणि पात्रांमधील गुंतागुंत प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. सध्या मालिकेत लाली-गोपाळच लग्न आहे. यात एकाचवेळी अनेक मोठे प्रसंग घडणार आहेत जे संपूर्ण कथेला नवं वळण देणार आहेत.


एकीकडे संपत्तीच्या वाटपावरून सुधाकर आणि अजीत यांच्यात जोरदार वाद उफाळतो. अजीतला इतक्या सहज जमीन मिळाल्याचं पाहून सुधाकर चिडतो आणि त्यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण होतं. याच काळात पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या विधी सुरु होतात. लालीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. पण हा आनंद किती काळ टिकणार हे कोणीच सांगू शकत नाही.



दुसरीकडे, अजीत एक धक्कादायक पाऊल उचलतो. लग्न आटपल्यावर गोंधळाच्या आदल्या रात्री मनीषाच्या मदतीने तो मॅकला गुपचूप गाडतो. रात्रभर मेहनत करून पहाटेपर्यंत तो हे प्रकरण हातावेगळं करतो आणि वेळेवर गोंधळासाठी घरीही पोहोचतो. पण अजीतच्या या वागणुकीवर संशयाची छाया लवकरच पडणार आहे.


सोनम म्हसवेकर म्हणजेच लालीने लग्नाच्या सीन बद्दल बोलताना सांगितलं "आमच्या वाड्यापुढेच फार सुंदर मंडप उभा केला गेलाय. मेहंदी, घाणा भरणी, चुडा भरण्याचा कार्यक्रम, हळद, लग्न, हे सर्व तिथेच शूट झालं आणि इतकच नाही तर अजून गृहप्रवेश, गोंधळ शूट बाकी आहे. हळदीमध्ये बैंड वाजला तेव्हा मला माझ्या बालपणीची आठवण आली. आगरी समाजामध्ये मी लहानाची मोठी झाले. तिथे हळदीला असाच बैंड आणि अशीच गाणी वाजवली जातात.


पूर्ण पारंपरिक पद्धतीने, रीतिरिवाजाने गोपाळ -लालीच लग्न शूट होतंय. रोज मला नवरी म्हणून छान लुक मध्ये तयार केलं जातंय. खरं सांगू तर मला ह्या पारंपरिक पद्धती, रीती, गाणी ह्याचं फार कुतूहल आहे.


मला मालिकेतली लग्न फार आवडतात. तब्बल ८ ते १० दिवस माझं लग्न शूट होतंय. संपूर्ण युनिटचा उत्साह पाहून शूट करायला अजूनच मजा येते आहे.


मला एक किस्सा सांगायला आवडेल इथे, आम्ही एक लग्नाचा रील विडिओ शूट केला ‘नवरी नटली' गाण्यावर जो तुम्ही सर्वानी पहिली असेलच, तो विडिओ शूट करण्यासाठी जी आमची मेहनत गेली आहे, कारण सर्वजण एकत्र मिळणं मुश्किल होत. पूर्ण दिवस निघून गेला आणि मध्यरात्री आम्ही ती रील शूट केली, जेव्हा किरण म्हणजेच गोपाळचा एक क्लोज सीन लागला होता आणि त्यांनी दिग्दर्शक सराना विनंती केली आम्हाला ती रील शूट करायला वेळ देण्यासाठी, सरांनी आम्हाला थोडा वेळ दिला आणि सर आम्हाला तो विडिओ शूट करताना पाहून खूप हसत होते."


या सर्व घडामोडींमुळे मालिकेमध्ये एक नवा थरारक टप्पा सुरू होणार आहे. अजीतचा गुन्हा उघडकीस येणार का? मनीषा खरं सांगणार का? गोपाल आणि लालीचं सुखाचं आयुष्य सुरू होणार की त्यातही अडथळे येणार? की अजूनही एक नवं रहस्य समोर येणार. या सर्व प्रश्नांची उत्तर येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहेत.

Comments
Add Comment

Standup Comedian Pranit More Apology : ‘ती माझी सर्वात मोठी चूक होती’; 370 Biryani प्रकरणावर प्रणित मोरेचे स्पष्टीकरण

मुंबई : 370 Biryani वाद (Controversy) आणि महाराष्ट्र सायबर (Maharashtra Cyber) गुन्हा दाखल प्रकरणानंतर स्टँडअप कॉमेडियन (Stand-up Comedian) प्रणित मोरे

Deool Band 2 : 'देऊळ बंद २'ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; २३ दिवसांत ६५ कोटींचा टप्पा पार, १०० कोटींच्या दिशेने वाटचाल

मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला देऊळ बंद २ (Deool Band 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, लवकरच...; चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव

Prajakta Mali : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी

Devendra Fadnavis on Pranit More Controversy : वादग्रस्त कंटेंटमुळे प्रणित मोरे अडचणीत; प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया!

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन (Stand-up Comedian) प्रणित मोरे (Pranit More) याच्या शोमधील (Show) काही वादग्रस्त आणि आक्षेपार्ह व्हिडीओ

Pranit More : प्रणित मोरेच्या शोवर सायबरचा मोठा दणका! डॉ. सेजल पवारसह तिघांविरोधात गुन्हा; समन्सही बजावले

मुंबई : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या वादग्रस्त शोप्रकरणी महाराष्ट्र सायबरने मोठी कारवाई केली

'Deool Band 2' Box Office Collection : ‘देऊळ बंद २’ची बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई! रितेश देशमुखच्या ‘वेड’ला टाकलं मागे

- २० व्या दिवशीही कमाईचा जोर कायम मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी २०२६ हे वर्ष सुवर्णकाळ ठरत असून बॉक्स ऑफिसवर