'देवमाणूस' मालिकेत नेमकं चाललंय तरी काय?

लालीचं स्वप्न पूर्ण होणार; गोपाळशी बांधली जाणार लग्नगाठ!


मुंबई : झी मराठीवरील थरारक मालिका 'देवमाणूस- मधला अध्याय' प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे. दर आठवड्यला मालिकेत काही ना काही रोमांचक गोष्टी घडत आहेत. प्रेम, स्वार्थ, गुन्हा आणि कौटुंबिक संघर्ष यांचा अफलातून संगम असलेली ही मालिका रोजच्या भागांमधून उलगडत जाणारी रहस्यं, उत्कंठावर्धक वळणं आणि पात्रांमधील गुंतागुंत प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. सध्या मालिकेत लाली-गोपाळच लग्न आहे. यात एकाचवेळी अनेक मोठे प्रसंग घडणार आहेत जे संपूर्ण कथेला नवं वळण देणार आहेत.


एकीकडे संपत्तीच्या वाटपावरून सुधाकर आणि अजीत यांच्यात जोरदार वाद उफाळतो. अजीतला इतक्या सहज जमीन मिळाल्याचं पाहून सुधाकर चिडतो आणि त्यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण होतं. याच काळात पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या विधी सुरु होतात. लालीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. पण हा आनंद किती काळ टिकणार हे कोणीच सांगू शकत नाही.



दुसरीकडे, अजीत एक धक्कादायक पाऊल उचलतो. लग्न आटपल्यावर गोंधळाच्या आदल्या रात्री मनीषाच्या मदतीने तो मॅकला गुपचूप गाडतो. रात्रभर मेहनत करून पहाटेपर्यंत तो हे प्रकरण हातावेगळं करतो आणि वेळेवर गोंधळासाठी घरीही पोहोचतो. पण अजीतच्या या वागणुकीवर संशयाची छाया लवकरच पडणार आहे.


सोनम म्हसवेकर म्हणजेच लालीने लग्नाच्या सीन बद्दल बोलताना सांगितलं "आमच्या वाड्यापुढेच फार सुंदर मंडप उभा केला गेलाय. मेहंदी, घाणा भरणी, चुडा भरण्याचा कार्यक्रम, हळद, लग्न, हे सर्व तिथेच शूट झालं आणि इतकच नाही तर अजून गृहप्रवेश, गोंधळ शूट बाकी आहे. हळदीमध्ये बैंड वाजला तेव्हा मला माझ्या बालपणीची आठवण आली. आगरी समाजामध्ये मी लहानाची मोठी झाले. तिथे हळदीला असाच बैंड आणि अशीच गाणी वाजवली जातात.


पूर्ण पारंपरिक पद्धतीने, रीतिरिवाजाने गोपाळ -लालीच लग्न शूट होतंय. रोज मला नवरी म्हणून छान लुक मध्ये तयार केलं जातंय. खरं सांगू तर मला ह्या पारंपरिक पद्धती, रीती, गाणी ह्याचं फार कुतूहल आहे.


मला मालिकेतली लग्न फार आवडतात. तब्बल ८ ते १० दिवस माझं लग्न शूट होतंय. संपूर्ण युनिटचा उत्साह पाहून शूट करायला अजूनच मजा येते आहे.


मला एक किस्सा सांगायला आवडेल इथे, आम्ही एक लग्नाचा रील विडिओ शूट केला ‘नवरी नटली' गाण्यावर जो तुम्ही सर्वानी पहिली असेलच, तो विडिओ शूट करण्यासाठी जी आमची मेहनत गेली आहे, कारण सर्वजण एकत्र मिळणं मुश्किल होत. पूर्ण दिवस निघून गेला आणि मध्यरात्री आम्ही ती रील शूट केली, जेव्हा किरण म्हणजेच गोपाळचा एक क्लोज सीन लागला होता आणि त्यांनी दिग्दर्शक सराना विनंती केली आम्हाला ती रील शूट करायला वेळ देण्यासाठी, सरांनी आम्हाला थोडा वेळ दिला आणि सर आम्हाला तो विडिओ शूट करताना पाहून खूप हसत होते."


या सर्व घडामोडींमुळे मालिकेमध्ये एक नवा थरारक टप्पा सुरू होणार आहे. अजीतचा गुन्हा उघडकीस येणार का? मनीषा खरं सांगणार का? गोपाल आणि लालीचं सुखाचं आयुष्य सुरू होणार की त्यातही अडथळे येणार? की अजूनही एक नवं रहस्य समोर येणार. या सर्व प्रश्नांची उत्तर येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहेत.

Comments
Add Comment

'मी कट्टर भाजप समर्थक', गंधार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे विधान चर्चेत!

ठाणे: बालदिनाचे औचित्य साधून प्रख्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्काराने

बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाश आता उद्योजिका; करणार 'हा' व्यवसाय

मुंबई : बिग बॉस १५ ची विजेती आणि नागीण मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजस्वी प्रकाश आता केवळ अभिनयावर अवलंबून न

राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा

मुंबई : आता आणखी एक सेलिब्रिटी जोडपं म्हणजेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनीही पॅरेंट्स

‘राम-लीला’ला १२ वर्षे: रणवीर सिंगच्या उत्कटतेने आणि रूपांतराने घडवलेला आयकॉनिक ‘राम’

मुंबई : रणवीर सिंगने साकारलेल्या ‘राम’ या अविस्मरणीय पात्राने प्रेम, अभिनय आणि सिनेमातील तीव्रतेची नव्याने

‘इंडियन आयडॉल’मध्ये अंशिकाच्या परफॉर्मन्सवर शिबानी अख्तरची दाद, म्हणाल्या “रॉक ऑनचा सिक्वेल झाला तर तूच राहशील बँडची लीडर!”

मुंबई : ‘इंडियन आयडॉल’च्या ताज्या विकेंड एपिसोडमध्ये प्रेक्षकांना संगीत, भावना आणि प्रेरणेचा एक सुंदर मेळ

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी अफवा: IFTDA अध्यक्ष अशोक पंडित यांची पापाराझींविरोधात तक्रार

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयी गेल्या काही दिवसांत पसरलेल्या अफवांनी