'देवमाणूस' मालिकेत नेमकं चाललंय तरी काय?

लालीचं स्वप्न पूर्ण होणार; गोपाळशी बांधली जाणार लग्नगाठ!


मुंबई : झी मराठीवरील थरारक मालिका 'देवमाणूस- मधला अध्याय' प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे. दर आठवड्यला मालिकेत काही ना काही रोमांचक गोष्टी घडत आहेत. प्रेम, स्वार्थ, गुन्हा आणि कौटुंबिक संघर्ष यांचा अफलातून संगम असलेली ही मालिका रोजच्या भागांमधून उलगडत जाणारी रहस्यं, उत्कंठावर्धक वळणं आणि पात्रांमधील गुंतागुंत प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. सध्या मालिकेत लाली-गोपाळच लग्न आहे. यात एकाचवेळी अनेक मोठे प्रसंग घडणार आहेत जे संपूर्ण कथेला नवं वळण देणार आहेत.


एकीकडे संपत्तीच्या वाटपावरून सुधाकर आणि अजीत यांच्यात जोरदार वाद उफाळतो. अजीतला इतक्या सहज जमीन मिळाल्याचं पाहून सुधाकर चिडतो आणि त्यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण होतं. याच काळात पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या विधी सुरु होतात. लालीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. पण हा आनंद किती काळ टिकणार हे कोणीच सांगू शकत नाही.



दुसरीकडे, अजीत एक धक्कादायक पाऊल उचलतो. लग्न आटपल्यावर गोंधळाच्या आदल्या रात्री मनीषाच्या मदतीने तो मॅकला गुपचूप गाडतो. रात्रभर मेहनत करून पहाटेपर्यंत तो हे प्रकरण हातावेगळं करतो आणि वेळेवर गोंधळासाठी घरीही पोहोचतो. पण अजीतच्या या वागणुकीवर संशयाची छाया लवकरच पडणार आहे.


सोनम म्हसवेकर म्हणजेच लालीने लग्नाच्या सीन बद्दल बोलताना सांगितलं "आमच्या वाड्यापुढेच फार सुंदर मंडप उभा केला गेलाय. मेहंदी, घाणा भरणी, चुडा भरण्याचा कार्यक्रम, हळद, लग्न, हे सर्व तिथेच शूट झालं आणि इतकच नाही तर अजून गृहप्रवेश, गोंधळ शूट बाकी आहे. हळदीमध्ये बैंड वाजला तेव्हा मला माझ्या बालपणीची आठवण आली. आगरी समाजामध्ये मी लहानाची मोठी झाले. तिथे हळदीला असाच बैंड आणि अशीच गाणी वाजवली जातात.


पूर्ण पारंपरिक पद्धतीने, रीतिरिवाजाने गोपाळ -लालीच लग्न शूट होतंय. रोज मला नवरी म्हणून छान लुक मध्ये तयार केलं जातंय. खरं सांगू तर मला ह्या पारंपरिक पद्धती, रीती, गाणी ह्याचं फार कुतूहल आहे.


मला मालिकेतली लग्न फार आवडतात. तब्बल ८ ते १० दिवस माझं लग्न शूट होतंय. संपूर्ण युनिटचा उत्साह पाहून शूट करायला अजूनच मजा येते आहे.


मला एक किस्सा सांगायला आवडेल इथे, आम्ही एक लग्नाचा रील विडिओ शूट केला ‘नवरी नटली' गाण्यावर जो तुम्ही सर्वानी पहिली असेलच, तो विडिओ शूट करण्यासाठी जी आमची मेहनत गेली आहे, कारण सर्वजण एकत्र मिळणं मुश्किल होत. पूर्ण दिवस निघून गेला आणि मध्यरात्री आम्ही ती रील शूट केली, जेव्हा किरण म्हणजेच गोपाळचा एक क्लोज सीन लागला होता आणि त्यांनी दिग्दर्शक सराना विनंती केली आम्हाला ती रील शूट करायला वेळ देण्यासाठी, सरांनी आम्हाला थोडा वेळ दिला आणि सर आम्हाला तो विडिओ शूट करताना पाहून खूप हसत होते."


या सर्व घडामोडींमुळे मालिकेमध्ये एक नवा थरारक टप्पा सुरू होणार आहे. अजीतचा गुन्हा उघडकीस येणार का? मनीषा खरं सांगणार का? गोपाल आणि लालीचं सुखाचं आयुष्य सुरू होणार की त्यातही अडथळे येणार? की अजूनही एक नवं रहस्य समोर येणार. या सर्व प्रश्नांची उत्तर येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहेत.

Comments
Add Comment

Bigg Boss Marathi : राकेश बापटने तन्वीला केलं किस; राखी सावंत भडकली आणि ....

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये राखी सावंत आल्यापासून रोज नवनवीन ड्रामा पाहायला मिळतो. राखी सावंतची

Rashmika Vijay Wedding रश्मिकाला मंगळसूत्र घालताना थरथरले विजयचे हात, म्हणाला, "तिला काहीच वाटत नव्हतं, पण मी मात्र

मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वांत लाडकी जोडी, म्हणजेच अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय

Bigg Boss Marathi 6: अनुश्रीचा प्लॅन फसला; बिग बॉसमधील कपल पुन्हा एकत्र

मुंबई : ' बिग बॉस मराठी ६ 'च्या २६ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये बिग बॉस कॅप्टन्सी टास्क घेतात. पहिल्या फेरीत विशाल

पिंट्या’ फेम रोहन गुजर होणार बाबा; आठ वर्षांनंतर आयुष्यातआला आनंद

मुंबई : 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला पिंट्या म्हणजेच अभिनेता रोहन गुजर लवकरच बाबा

शुभमंगल सावधान! अखेर दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मीका मंदाना यांचा विवाहसोहळा संपन्न झाला

मुंबई : मनोरंजन क्षेत्रातील सर्वांची आवडती जोडी आणि चाहते ज्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते असे

'फुला'तून उलगडणार मुरळीची संघर्षमय कथा

मुंबई : अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षमय कथा आगामी 'फुला' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पहायला