Maratha Community Meeting Dispute: सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी! नेमकं काय घडलं?

सोलापुर: सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. हाणामारीच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. बैठकीतील कार्यकर्त्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. जन्मजयराजे भोसले यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

अक्कलकोटध्ये शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं होतं. या घटनेने सोलापुरातील राजकीय वातवरण तापलं आहे. प्रवीण गायकवाड यांना काळं फासल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक निषेध नोंदवला आहे. या प्रकरणाचे पडसाद मराठा समाजातही उमटले आहेत. याच पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीत राडा झाल्याची घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?


प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोलापुरात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच बैठकीत हा गोंधळ निर्माण झाला. जन्मजयराजे भोसले यांच्या कार्यकर्त्याकडून एका कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. या हाणामारीच्या घटनेनंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली.
Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा