रुग्णवाहिका चालकांची मुजोरी; कल्याणमध्ये रुग्णवाहिकेच्या भाड्यावरून वाद, मजुराचा मृतदेह ३ तास रस्त्यावरच पडून!

  67

कल्याण: कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाबाहेर खासगी रुग्णवाहिका चालकांच्या दादागिरीमुळे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका गरीब मजुराचा मृतदेह रुग्णवाहिकेच्या भाड्यावरून झालेल्या वादानंतर तब्बल तीन तास रुग्णालयाच्या शवागारात पडून राहिला. भाडे कमी देण्यास तयार असलेल्या दुसऱ्या रुग्णवाहिका चालकाला अडवल्याने हा संतापजनक प्रकार घडला, ज्यामुळे मृतदेहाचीही विटंबना झाल्याची चर्चा सुरू आहे. केडीएमसी प्रशासन यावर काय करते, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.



२५ हजार विरुद्ध १५ हजार: मृतदेह ताटकळला


तेलंगणा राज्यातील करिया बिच्चप्पा हा मजूर कल्याणमध्ये एका इमारतीवरून पडून मरण पावला. त्याच्या मृतदेहाचे रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. करियाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, त्याच्या तीन मुली आहेत. त्याच्या कमाईवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्यामुळे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले. नातेवाईकांनी आणि मित्रांनी पैसे गोळा करून करियाचा मृतदेह तेलंगणातील त्याच्या गावी नेण्याचे ठरवले.


त्यासाठी खासगी रुग्णवाहिका चालक रोशन शेख याच्याशी संपर्क साधला असता, त्याने २५ हजार रुपये भाडे मागितले. कुटुंबीयांनी पैसे कमी करण्याची विनंती केली, पण शेखने ती नाकारली. त्याचवेळी, दुसरा चालक समीर मेमन १५ हजार रुपयांत मृतदेह घेऊन जाण्यास तयार झाला. करियाच्या नातेवाईकांनी त्याला होकार दिला, पण रोशन शेखने समीरला रोखले आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. या दोघांच्या भाड्यावरून सुरू असलेल्या वादात करियाचा मृतदेह तीन तासांहून अधिक काळ शवगृहात पडून होता.



युनियनची दादागिरी की वाजवी भाडे?


या प्रकरणी चालक समीर मेमन म्हणाला की, "मी गरिबांची परिस्थिती पाहून कमी दरात तयार झालो, पण इथे कोणतेही युनियन नसताना दुसरा चालक 'युनियन'च्या नावाखाली दादागिरी करतोय." दुसरीकडे, रोशन शेखने सांगितले की, "७०० किमी अंतरासाठी २५ हजार रुपये भाडे योग्य होते. आम्ही कोणालाही अडवले नाही."


या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. "रुग्णालयाबाहेर गरिबांची लूट आणि रुग्णवाहिका चालकांची मुजोरी ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही," असे स्थानिक सांगतात. केडीएमसी प्रशासन यावर फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.


यापूर्वी याच रुग्णालयात केवळ हजार रुपयांवरून रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे, केडीएमसी प्रशासनातील वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी नेमके काय करत आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

Senior Citizen Suicide: ८६ वर्षीय आजोबांची आत्महत्या! सुसाइड नोटमध्ये लिहिले...

नेरळ मधील तलावात ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या करत संपवले जीवन नेरळ: आयुष्याला कंटाळून एका वृद्ध व्यक्तीने नेरळ