रुग्णवाहिका चालकांची मुजोरी; कल्याणमध्ये रुग्णवाहिकेच्या भाड्यावरून वाद, मजुराचा मृतदेह ३ तास रस्त्यावरच पडून!

कल्याण: कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाबाहेर खासगी रुग्णवाहिका चालकांच्या दादागिरीमुळे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका गरीब मजुराचा मृतदेह रुग्णवाहिकेच्या भाड्यावरून झालेल्या वादानंतर तब्बल तीन तास रुग्णालयाच्या शवागारात पडून राहिला. भाडे कमी देण्यास तयार असलेल्या दुसऱ्या रुग्णवाहिका चालकाला अडवल्याने हा संतापजनक प्रकार घडला, ज्यामुळे मृतदेहाचीही विटंबना झाल्याची चर्चा सुरू आहे. केडीएमसी प्रशासन यावर काय करते, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.



२५ हजार विरुद्ध १५ हजार: मृतदेह ताटकळला


तेलंगणा राज्यातील करिया बिच्चप्पा हा मजूर कल्याणमध्ये एका इमारतीवरून पडून मरण पावला. त्याच्या मृतदेहाचे रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. करियाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, त्याच्या तीन मुली आहेत. त्याच्या कमाईवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्यामुळे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले. नातेवाईकांनी आणि मित्रांनी पैसे गोळा करून करियाचा मृतदेह तेलंगणातील त्याच्या गावी नेण्याचे ठरवले.


त्यासाठी खासगी रुग्णवाहिका चालक रोशन शेख याच्याशी संपर्क साधला असता, त्याने २५ हजार रुपये भाडे मागितले. कुटुंबीयांनी पैसे कमी करण्याची विनंती केली, पण शेखने ती नाकारली. त्याचवेळी, दुसरा चालक समीर मेमन १५ हजार रुपयांत मृतदेह घेऊन जाण्यास तयार झाला. करियाच्या नातेवाईकांनी त्याला होकार दिला, पण रोशन शेखने समीरला रोखले आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. या दोघांच्या भाड्यावरून सुरू असलेल्या वादात करियाचा मृतदेह तीन तासांहून अधिक काळ शवगृहात पडून होता.



युनियनची दादागिरी की वाजवी भाडे?


या प्रकरणी चालक समीर मेमन म्हणाला की, "मी गरिबांची परिस्थिती पाहून कमी दरात तयार झालो, पण इथे कोणतेही युनियन नसताना दुसरा चालक 'युनियन'च्या नावाखाली दादागिरी करतोय." दुसरीकडे, रोशन शेखने सांगितले की, "७०० किमी अंतरासाठी २५ हजार रुपये भाडे योग्य होते. आम्ही कोणालाही अडवले नाही."


या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. "रुग्णालयाबाहेर गरिबांची लूट आणि रुग्णवाहिका चालकांची मुजोरी ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही," असे स्थानिक सांगतात. केडीएमसी प्रशासन यावर फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.


यापूर्वी याच रुग्णालयात केवळ हजार रुपयांवरून रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे, केडीएमसी प्रशासनातील वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी नेमके काय करत आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर