वरुण ऍरॉन आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी

  49

नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२६ च्या आधी माजी वेगवान गोलंदाज वरुण ऍरॉनची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. सनरायर्झच्या फ्रँचायझीने सांगितले की, ऍरॉन न्यूझीलंडचा माजी गोलंदाज जेम्स फ्रँकलिनची जागा घेईल.


वरुणने २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने त्याच्या कारकिर्दीत नऊ एकदिवसीय आणि तितकेच कसोटी सामने खेळले. त्याने गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.


वरुणने २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि भारतासाठी खेळलेल्या एकूण नऊ कसोटी सामन्यांमध्ये १८ विकेट्स घेतल्या. या दरम्यान त्याची इकॉनॉमी ४.७८ होती. त्याच वेळी कसोटी पदार्पणाच्या फक्त एक महिना आधी त्याला इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. वरुणने नऊ एकदिवसीय सामन्यात ११ विकेट्स घेतल्या.


वरुण आयपीएलमध्येही खेळला होता आणि त्याने ५२ आयपीएल सामन्यांमध्ये एकूण ४४ विकेट्स घेतल्या. वरुणने नोव्हेंबर २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.तर तो नोव्हेंबर २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. वरुणने एप्रिल २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएलमध्ये आपला शेवटचा सामना खेळला होता.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल