चित्रपटसृष्टीला धक्का, सलग दोन दिवसांत दोन कलाकारांचे निधन

बंगळुरू : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. सलग दोन दिवसांत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी संबंधित दोन कलाकारांचे निधन झाले. रविवार १३ जुलै २०२५ रोजी हैदराबादमधील फिल्मनगर येथील घरी कोटा श्रीनिवास राव यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८३ वर्षांचे होते आणि मागील काही दिवसांपासून आजारी होते. या धक्क्यातून सावरत नाही तोच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला दुसरा धक्का बसला. ज्येष्ठ कानडी अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे सोमवार १४ जुलै २०२५ रोजी बंगळुरू येथे ८७ व्या वर्षी निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून बी. सरोजा देवी आजारी होत्या.

कोण होत्या बी. सरोजा देवी ?


कानडी, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सरोजा देवी त्यांच्या काळातील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक प्रथितयश कलाकार होत्या. त्यांनी निवडक हिंदी चित्रपटांतूनही काम केले होते. महाकवी कालिदास या कानडी चित्रपटातून १९५५ मध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीला 'अभिनय सरस्वती' आणि 'कन्नडथु पैंगिली' या नावांनी ओळखले जात असे.

दिग्गज अभिनेते एमजी रामचंद्रन (एमजीआर) यांच्यासोबत बी. सरोजा देवी यांनी १९५८ मध्ये 'नादोदी मन्नन' या तमिळ चित्रपटाच्या निमित्ताने काम केले होते. बी. सरोजा देवी यांनी शिवाजी गणेशन, एनटी रामा राव आणि शम्मी कपूर यांच्यासोबत काम केले होते. चित्रपटसृष्टीतील कार्यासाठी बी. सरोजा देवी यांना सरकारने पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित केले होते.


कोण होते कोटा श्रीनिवास राव ?


कोटा श्रीनिवास राव यांचा जन्म १० जुलै १९४२ रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कांकीपाडू येथे झाला. त्यांनी १९७८ मध्ये 'प्रणम खरेधू' या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. आपल्या चार दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत त्यांनी ७५० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केले. त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिका जास्त गाजल्या. तेलुगू चित्रपटसृष्टीत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. निवडक चित्रपटांतून त्यांनी सकारात्मक आणि विनोदी भूमिकाही साकारल्या.

चित्रपटसृष्टीत यश मिळवणाऱ्या कोटा श्रीनिवास राव यांनी १९९० च्या दशकात भाजपात प्रवेश केला. ते १९९९ मध्ये विजयवाडा पूर्व विधानसभा मतदारसंघातून आंध्र प्रदेश विधानसभेवर निवडून आले. सिनेविश्वात येण्याआधी काही काळ बँकेत नोकरी केलेल्या कोटा श्रीनिवास राव यांनी पुढे अभिनय क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली.

भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी कोटा श्रीनिवास राव यांना २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोटा श्रीनिवास राव यांना आधी डॉक्टर व्हायचे होते, परंतु अभिनयाच्या त्यांच्या आवडीमुळे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आर. चंद्रू यांचा 'कबजा' हा कोटा श्रीनिवास राव यांचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटात उपेंद्र राव, शिवा राजकुमार, किचा सुदीप, श्रिया सरन आणि मुरली शर्मा सारखे कलाकार होते.
Comments
Add Comment

Samarth Panel : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या

CINTAA : रणवीर सिंग-फरहान अख्तर वादावर CINTAA अध्यक्ष पूनम ढिल्लों यांची स्पष्टोक्ती; 'कलाकारांना कामगार म्हणून अधिकृत मान्यता मिळवणे हेच आमचे ध्येय'

NAVI MUMBAI : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील अलीकडील वादाच्या पार्श्वभूमीवर CINTAA च्या अध्यक्षा

Janhavi kapoor :वजन कमी करण्यासाठी जान्हवी कपूरने दिला सल्ला; म्हणाली…

वजन वाढणे किंवा वजन कमी होणे या समस्यांचा अनेकांना सामना करावा लागतो. बदलती जीवनशैली आणि आरोग्याच्या विविध

Sairat :आकाश सोबतच्या पोस्टवर अखेर रिंकू राजगुरूने स्वत: केला खुलासा !

सैराट चित्रपटामुळे मराठी चित्रपटसृष्टिला एक वेगळी दिशा मिळाली. जगभरात १०० कोटींची कमाई करणारा 'सैराट' हा पहिला

Ranveer singh :धुरंधर फेम बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग वरील बंदी प्रकरणी FWICE चा खुलासा

मुंबई : धुरंधर फेम बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग वर बॉलिवूडने बंदी घालण्यात आल्याचे वृत्त आले. या प्रकरणी आता

Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal : चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून नीलम शिर्केंची माघार

मुंबई : 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'च्या (Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal) ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांचा पत्ता कट